…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

वरळीतील सावली इमारतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळ पुनर्विकासात 500 चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने तो गुपचूप मागे घेतला. हे सरकार मराठी माणसाचे नक्कीच नाही, महाराष्ट्राचेही नाही… हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. महाराष्ट्राची अनेक वर्ष सेवा करणाऱया शासकीय कर्मचाऱयांच्या ‘सावली’ इमारतीला भाजप सरकारची ‘सावली’ नाही, पण अदानी समुहाला मात्र मुंबईत 1600 एकर भूखंडासोबत अनेक ‘सवलती’ दिल्या जाताहेत. असे आदित्य ठाकरे यांनी त्यात म्हटले आहे.

पोलिसांना तरी घरे देणार का?

सावलीचा जीआर सरकारने मागे घेतला. आता वरळी, एन.एम. जोशी मार्ग आणि वडाळा बी.डी.डी. चाळीत राहणाऱया पोलीस परिवारांचा प्रश्न आहे. त्यांना तरी हे सरकार घरे देणार आहे का? की इथेही जुमलाच करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला मुंबईचे

‘अदानीनगर’ करायचेय!

धारावी पुनर्विकासासंदर्भात जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 75 टक्के धारावीकरांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. आम्ही सुरुवातीपासून हाच प्रश्न विचारतोय, की अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय? धारावीकरांचा की स्वतःचा? असे नमूद करतानाच ‘कदाचित मुंबईचं नाव ‘अदानीनगर’ करण्याचा भाजपचा विचार आहे,’ असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नीरा येथे संत सोपानकाकांच्या पालखीचे उत्साहात स्वागत नीरा येथे संत सोपानकाकांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
टाळ-मृदंगांच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषात आज दुपारी साडेबारा वाजता संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे नीरा येथे उत्साहात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी...
हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार; तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल
वाल्मीकींच्या तपोभूमीत विसावला वैष्णवांचा मेळा
महाराज भाऊिंसहजी यांचे दुर्मिळ सात खंड उपलब्ध; छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र व माहितीला उजाळा
भाजप नेत्याकडून पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
खामकरवाडी पाझर तलाव ‘ओव्हरफ्लो’
Uttarakhand accident – प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक बेपत्ता, मदत आणि बचावकार्य सुरू