6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण

6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणात खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भूमाफिया, बिल्डर आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दलालांच्या मुसक्या आवळा अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेघर होणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळ न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

भूमाफिया आणि काही बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे रेरा नोंदणी करून कल्याण, डोंबिवलीत शेकडो बेकायदा इमारती उभ्या केल्या आहेत. यातील 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायाल याने दिले आहेत. यामुळे साडेसहा हजार कुटुंबीय रस्त्यावर येण्याचा धोका आहे. आयुष्याची पुंजी खर्चुनही डोक्यावरचे छप्पर जाणार असल्याने 65 इमारतींमधील रहिवाशांनी शासनाकडे दाद मागितली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इमारती पाडल्या जाणार नाहीत असे आश्वासन देऊन मते मिळवली होती. मात्र सत्तेवर येताच महायुती सरकारने या रहिवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. पालिकेने रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत.

न्यायाची खात्री
धास्तावलेल्या फ्लॅटधारकांनी शिवसेनाच आपल्याला न्याय देईल या खात्रीने कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे यांनी ऐन पावसाळ्यात नागरिकांना बेघर करणे चुकीचे असल्याचे सांगितले. 65 इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश
    कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच
बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? सुप्रिया सुळेंचे महायुती सरकारच्या धोरणावर बोट
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
रील्ससाठी महिलेने चक्क रूळावर चालवली कार, रेल्वे वाहतुकीला फटका; 15 ट्रेनचे मार्ग बदलले
Pandharpur Aashadhi Ekadashi 2025 विठ्ठल प्रसादाची जय्यत तयारी, 14 लाख बुंदी आणि राजगिरा लाडू घेतले बांधायला