डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला

डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला

पालघरमधील हजारो ग्रामस्थ आणि भुमिपुत्रांचा विरोध डावलून केंद्र सरकारने वाढवणवासियांवर महाकाय बंदर लादले आहे. या बंदराच्या विरोधात पुन्हा एकदा संघर्ष धगधगला असून या बंदरासाठी चोरी छुपके ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न आज भुमिपुत्रांनी हाणून पाडला. समुद्राच्या भरती-ओहोटीचा ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आयटीडीजी या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वाढवणमध्ये पोलीस बंदोबस्तात धडकले व त्यांनी मनमानी सुरू केली. ही बाब समजताच शेकडो ग्रामस्थांनी धाव घेऊन जोरदार विरोध केला. त्यांनी चले जाव.. चले जाव.., आयटीडीजी चले जाव.. अशा घोषणांनी डहाणूचा किनारा दणाणून सोडला. त्यानंतर आयटीडीजी कंपनीच्या अधिकाऱयांनी सर्व्हेक्षण गुंडाळत काढता पाय घेतला.

भूमिपुत्र आणि मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर नकोच असा निर्धार पालघरवासीयांनी केला आहे. मात्र प्रखर विरोधानंतरही केंद्रातील मोदी सरकारने हा प्रकल्प लादला आहे. या बंदरामुळे रोजगार उपलब्ध होईल असा दावा केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत येथे बंदर नकोच अशी ठाम भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. बंदरामुळे वाढवणमधील मच्छीमार देशोधडीला लागतील. समुद्रातील जलचर संपत्ती देखील धोक्यात येणार आहे. मात्र वेळोवेळी विरोध करूनही आज समुद्राचे सर्व्हेक्षण करणाऱया आयटीडीजी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱयांचा ताफा पोलीस बंदोबस्तात गावामध्ये आला आणि त्यांनी ड्रोन उडवून समुद्र किनाऱयावर हायटाईडचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.

  • ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी ‘निरी’ या संस्थेला दिली आहे. तरीही खासगी कंपनीद्वारे ड्रोन सर्व्हेक्षण कशासाठी, असा सवाल करण्यात आला आहे.
  • आमच्या जमिनी, आमचा समुद्र आणि आमचे हक्क असून कोणत्याही परिस्थितीत लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून प्रकल्प लादण्याचा केंद्राचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
  • बंदर तर आम्ही होऊ देणार नाहीच, पण खासगी कंपनीमार्फत चोरीचुपके सर्व्हेक्षण केले जात असेल तर थेट न्यायालयात जाऊ, असा इशारा वाढवणवासीयांनी दिला आहे.

… म्हणे, पाऊस वाऱ्यामुळे सर्व्हे थांबवला

पावसाळी वातावरण आणि वाऱयामुळे ड्रोनच्या सर्व्हेक्षणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे तात्पुरता हा सर्व्हे थांबवला असून एक-दोन दिवसात पुन्हा पोलीस बंदोबस्तात सर्व्हेक्षणाचे काम सुरू होणार आहे. ग्रामपंचायतीला याची माहिती दिली असल्याचा दावा पालघरचे उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केला आहे.

गावातील नागरिकांना कुठलीही कल्पना न देता सर्व्हे एजन्सी थेट पोलिसांकडे गेली. आम्हाला पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही. त्याचबरोबर संबंधित एजन्सीकडूनही कुठलीही माहिती कळवण्यात आली नाही. त्यामुळे ड्रोन सर्वेक्षण गावकऱयांनी एकत्र येऊन बंद पाडले. – भूषण भोईर (ग्रामस्थ)

ग्रामपंचायतीला कळवलेच नाही

ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता आयटीडीजी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी भरती-ओहोटीचे सर्व्हेक्षण करत असल्याची माहिती गावकऱयांना मिळताच त्यांनी किनाऱयावर धाव घेतली. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखले व या सर्व्हेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे असे खोटेच सांगितले. त्यानंतर वाढवण विरोधी संघर्ष समिती, युवा संघर्ष समिती आणि स्थानिकांनी एकत्र येऊन आयटीडीजी या कंपनीला चले जावच्या घोषणा दिल्या. गावकऱयांच्या रुद्रावतारामुळे आयटीडीजी कंपनीच्या अधिकाऱयांनी गावातून काढता पाय घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा
अनेकदा आपण भाज्या कापताना कांद्याच्या साली निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु याच कांद्याच्या साली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. खासकरुन आपल्या...
ताडोबातील वाघांकडून सांबरांची सर्वाधिक शिकार, बिबट्यांची पसंती रानडुकरांना
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने आई ओरडली, अल्पवयीन मुलाने घेतला आईचा जीव
पावसाळ्यात ‘या’ भाज्यांपासून चार हात दूर राहा, नाहीतर आजारी पडाल! वाचा सविस्तर
मक्यापासून बनवलेले 5 पदार्थ पावसाची मजा द्विगुणित करतील
अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास…
फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी