शाळेत ‘बॉम्बा’बोंब इमारत केली रिकामी

शाळेत ‘बॉम्बा’बोंब इमारत केली रिकामी

नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल आला आणि एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळा रिकामी केली. बॉम्ब शोधण्यासाठी शाळेची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणतीही बॉम्बसदृश वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा ईमेल कोणी केला हे अद्यापही समजू शकले नाही.
नालासोपाराच्या श्रीप्रस्थ येथे राहुल इंटरनॅशनल शाळा आहे. याच्या शेजारी मदर मेरी इंग्लिश हायस्कूल आणि के. एल. तिवारी ज्युनिअर अॅण्ड डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स हे महाविद्यालय आहे. या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास अचानक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मेल आयडीवर शाळेत बॉम्ब ठेवला असून शाळा बॉम्बने उडवू असा निनावी ईमेल आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शाळा व्यवस्थापक व शिक्षकांनी याची माहिती नालासोपारा पोलिसांना दिली.
जीव भांड्यात पडला
वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल, नालासोपारा सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, क्राईम बँच युनिट तीनचे पथक, खंडणीविरोधी पथक, सायबर पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र यात काहीच सापडले नाही. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश
    कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच
बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? सुप्रिया सुळेंचे महायुती सरकारच्या धोरणावर बोट
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
रील्ससाठी महिलेने चक्क रूळावर चालवली कार, रेल्वे वाहतुकीला फटका; 15 ट्रेनचे मार्ग बदलले
Pandharpur Aashadhi Ekadashi 2025 विठ्ठल प्रसादाची जय्यत तयारी, 14 लाख बुंदी आणि राजगिरा लाडू घेतले बांधायला