पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू – हर्षवर्धन सपकाळ

पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू – हर्षवर्धन सपकाळ

पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारे लादले जाणारे अन्यायकारक भाषा धोरण खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्रातील चिन्मयी सुमित, राज असोंडकर, गिरीश सामंत, साधना गोरे व सुशील शेजुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज टिळक भवन येथे भेट घेऊन मराठी भाषा आणि शिक्षण धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, डॉ. दीपक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे. 16 एप्रिलच्या शासन निर्णयानंतर काँग्रेसने सर्वात आधी हिंदी सक्तीला विरोध केला होता. मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी हा निर्णय रद्द करू, असे सांगितले होते. पण त्यांनी शब्दछल करून पुन्हा त्याच आशयाचा शासन आदेश काढला. काँग्रेस पक्ष हा निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडेल. सरकार मधील दोन्ही घटक पक्षांनी नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली असून त्यांची ही भूमिका मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या छातीत सुरा खुपसण्यासारखी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, नियमबाह्य प्रक्रियेचा आरोप MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, नियमबाह्य प्रक्रियेचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विभागात...
उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा…
पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले एक्सरसाईज, हात-पाय आणि मानेचं दुखणं दूर होणार
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध
उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृ्त्यू
मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच; भाजप आमदाराचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी, पुरामळे हाहाकार; दोघांचा मृत्यू, दहा बेपत्ता