अघोषित आणि घोषित आणीबाणीतील फरक काय आहे, याचा विचार करण्याची गरज; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

अघोषित आणि घोषित आणीबाणीतील फरक काय आहे, याचा विचार करण्याची गरज; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. केंद्र सरकारने 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘संविधान हत्या दिवस’ साजरा करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. यावरच भाष्य करताना मुंबईतीत दादर येते वेगवेगळ्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले, असं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने दिलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “आणीबाणी होती आणि इंदिरा गांधींना दोष दिला. हे सर्व खरं आहे, पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. चित्र बदललं होतं. आता पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे.”

ते पुढे म्हणाले की, ” जे वृत्तपत्रात काम करतात, त्यांना माहीत असेल. बाकीच्यांना माहीत नाही. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडतंय. जे वृत्तपत्र त्यांचं मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एका प्रकारची धमकी पत्रकारांनाही दिली जात आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, नियमबाह्य प्रक्रियेचा आरोप MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, नियमबाह्य प्रक्रियेचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विभागात...
उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा…
पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले एक्सरसाईज, हात-पाय आणि मानेचं दुखणं दूर होणार
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध
उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृ्त्यू
मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच; भाजप आमदाराचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी, पुरामळे हाहाकार; दोघांचा मृत्यू, दहा बेपत्ता