हायकोर्टच्या नवीन संकुलाच्या कामाला मुहूर्त सापडेना!

हायकोर्टच्या नवीन संकुलाच्या कामाला मुहूर्त सापडेना!

उच्च न्यायालयाला बीकेसीत भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ ठरले आहे. गेल्या दीड वर्षात कामात ठोस प्रगती न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी मिंधे सरकारला चांगलेच ठणकावले. वारंवार विनंत्या केल्या. आता बस्स… खूप झाले. सरकारला साध्या गोष्टीही कळत नाहीत का? आम्हाला कठोर आदेश द्यायला भाग पाडू नका, असा सज्जड दम न्यायालयाने मिंधेंना दिला. तसेच न्यायालय इमारतीच्या भूखंडासंबंधी कार्यवाहीचा सविस्तर तपशील 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले.

सरकारने जानेवारी 2019 मधील आदेशाला अनुसरून उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जागा देणे आवश्यक आहे, मात्र त्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे मिंधे सरकारविरुद्ध अवमान कारवाई करण्याची मागणी करीत अॅड. अहमद अब्दी यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते अॅड. अब्दी आणि अॅड. एकनाथ ढोकळे यांनी सरकार अद्याप हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आणले. त्याची दखल घेत मुख्य न्यायमूर्तींनी मिंधे सरकारची खरडपट्टी काढली.

गांभीर्याने वागत नसाल तर कठोर दणका देणार

आम्ही वारंवार विनंती करतोय. आम्हाला कठोर आदेश देण्यास भाग पाडू नका. तुम्ही आधीच अवमान कारवाईला सामोरे जात आहात. नव्या इमारतीच्या भूखंडाबाबतची कार्यवाही कुठल्या टप्प्यात आहे, याचे साधे प्रतिज्ञापत्र आम्ही मागितले होते. तेही तुम्हाला जमत नाही. आता बस्स… खूप झाले. तुम्हाला या विषयाचे गांभीर्य कळत नसेल तर मग आमचा कठोर दणका काय असतो याचा सामना करण्याची तयारी सरकारने ठेवावी, असा इशारा न्यायमूर्तींनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चौथ्या टप्प्याचा निवडणूक प्रचार संपला; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांसह देशातील 96 जागांसाठी उद्या मतदान चौथ्या टप्प्याचा निवडणूक प्रचार संपला; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांसह देशातील 96 जागांसाठी उद्या मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि एक पेंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नगर,...
मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी बीकेसीत महाविकास आघाडीची अतिभव्य सभा
पोलिसाला चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे बदनामीच; हायकोर्टाचा प्रोसेस रद्द करण्यास नकार
मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मत मागतायत; अरविंद केजरीवाल यांचा दावा
अभिव्यक्ती- हिरामंडी : दास्तान-ए-कोठा संस्कृती!
मोदी गरीबांचे नाही, फक्त अब्जाधीशांचे मसिहा; नंदुरबारच्या सभेत प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज आहेत? शरद पवार यांचा घणाघात