भाजपच्या गोदामात सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

भाजपच्या गोदामात सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव कनौज येथून मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली असून पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर आणि एनडीएवर घणाघाती टीकास्त्र सोडले. भाजपच्या गोदामात आता सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया भरलेत असा हल्ला त्यांनी मोदी सरकारवर चढवला आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने सर्व भ्रष्टाचारी, गुंड आणि माफियांना आपल्या गोदामात ठेवले आहे. जितक्या लोकांनी देशाचा पैसा लुटला त्या सर्व लोकांना भाजपने आपल्याकडे घेतल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसेच भाजपने इतके मोठे गोदाम घेतले आहे की, प्रत्येक पक्षातील नेत्यांचा त्यात समावेश केलाय, असा टोलाही अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला लगावला.

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचाही यादव यांनी समाचार घेतला. सरकारने शेतकऱयांचा गहू खरेदी केला नाही. त्यांनी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी असे केले, ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकेल. भाजपचा हाच इरादा असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन