पावसाळ्यात ‘या’ भाज्यांपासून चार हात दूर राहा, नाहीतर आजारी पडाल! वाचा सविस्तर

पावसाळ्यात ‘या’ भाज्यांपासून चार हात दूर राहा, नाहीतर आजारी पडाल! वाचा सविस्तर

पावसाळा आल्यावर आपल्या आहारामध्ये बदल करणे हे अपरिहार्य आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या आहारात काही ठराविक महत्त्वाच्या भाज्यांचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात काय खाऊ नये हे सु्द्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळा ऋतू आपल्यासोबत ओलावा, घाण आणि विविध आजार घेऊन येत असतो. म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं हे गरजेचं आहे. बदलत्या हवामानासोबत अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये काही भाज्या टाळाव्यात किंवा मर्यादित प्रमाणात सेवन कराव्यात. मुख्य म्हणजे काही भाज्या या पावसाळ्यामध्ये लवकर खराब होतात. त्यामुळेच पावसाळ्यामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात मर्यादेमध्ये करावा हे माहीत असणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढते, त्यामुळेच बुरशी आणि कीटक भाज्यांमध्ये सहज प्रवेश करतात. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ नयेत. म्हणून, पावसाळ्यात काही भाज्या टाळायला हव्यात. म्हणूनच काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर, पावसाळ्यात आपण पचनाचे आजार होण्यापासून दूर राहू शकतो.

पालेभाज्या
पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्या खाणे टाळावे. पालेभाज्या ओलावा आणि घाण लवकर शोषून घेतात. पावसाळ्यात पालेभाज्या खाल्ल्यामुळे, पोटात संसर्ग, अतिसार किंवा विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात अगदी गरज असेल तरच, पालेभाज्या खाव्यात. परंतु पालेभाज्या खाण्यापूर्वी त्या मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यात धुवून खाव्यात.

Monsoon Soup – पावसाळी वातावरणात गरमागरम पालक सूप पिण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, वाचा

फ्लाॅवर आणि ब्रोकोली
फ्लाॅवर आणि ब्रोकोली यांच्या फुलांमध्ये पाण्याचा ओलावा राहतो. त्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया यामध्ये राहण्याचा संभव असतो. या भाज्या शिजवताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. या भाज्या व्यवस्थित शिजल्या नाहीत तर, गॅस, पोटदुखी आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच या भाज्या चांगल्या धुवून करणे हितावह.

कोबी
कोबी जमिनीच्या अगदी जवळ वाढतो, त्यामुळे माती, कीटकनाशके आणि कीटक त्यात शिरण्याचा धोका जास्त असतो. कोबी नीट न धुतल्यास, यामुळे विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. तसेच पोटदुखीची समस्याही वाढण्याची शक्यता असते.

मशरूम
मशरूम आर्द्र वातावरणात वाढतात आणि पावसाळ्यात लवकर खराब होतात. बाजारात मिळणारे साठवलेले मशरूम विषारी असू शकतात. बुरशीजन्य संसर्ग, ऍलर्जी किंवा विषबाधा होण्याचा धोका असतो. म्हणूनच मशरूम खरेदी करताना फार काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे.

वांगी
पावसाळ्यात वांगी लवकर खराब होतात आणि त्यात कीटकांची शक्यता जास्त असते. काही लोकांना वांग्याची अ‍ॅलर्जी देखील असते. यामुळे सूज, अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश
    कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच
बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? सुप्रिया सुळेंचे महायुती सरकारच्या धोरणावर बोट
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
रील्ससाठी महिलेने चक्क रूळावर चालवली कार, रेल्वे वाहतुकीला फटका; 15 ट्रेनचे मार्ग बदलले
Pandharpur Aashadhi Ekadashi 2025 विठ्ठल प्रसादाची जय्यत तयारी, 14 लाख बुंदी आणि राजगिरा लाडू घेतले बांधायला