तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या

तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या

अनेकदा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड घाम येऊ लागतो. ही परिस्थिती अनेकांसोबत घडते. पण तुम्हाला त्यामागील कारण माहित आहे का? जर तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल तर हे कशामुळे होतं? यामागे कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकत का? आणि त्यातून सुटका कशी मिळवावी हे जाणून घेऊयात.

आंघोळीनंतर घाम का येतो?
आंघोळीनंतर घाम येणे ही एक सामान्य स्थिती असू शकते, ज्याची अनेक कारणे असू शकतात. सहसा, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा हा शरीराचा स्वतःचा मार्ग असतो.

गरम पाण्याने आंघोळ करणे
आंघोळीनंतर घाम येणे हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा एक मार्ग असू शकतो. खरं तर, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते. हे तापमान सामान्य करण्यासाठी, शरीर घामवाटे ते बाहेर काढते जेणेकरून जास्तीची उष्णता बाहेर पडू शकेल.

बाथरूममध्ये आर्द्रता जास्त असणे
जर आंघोळ करताना बाथरूममध्ये चांगले वायुवीजन नसेल तर वाढत्या आर्द्रतेमुळे आणि उष्णतेमुळे घाम येऊ शकतो.

हार्मोन्स बदल
काही लोकांना त्यांच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे (जसे की थायरॉईड किंवा ताण) आंघोळीनंतर जास्त घाम येऊ शकतो.

संवेदनशील त्वचा
काही लोकांची त्वचा खूपच संवेदनशील असते, अशा लोकांना आंघोळीनंतर त्वचेचे छिद्र उघडल्यामुळे जास्त घाम येऊ शकतो.

पण याचा परिणाम निश्चितच आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे अनेकदा श्वास फुलणे, दम लागणे किंवा धाप लाण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे आहे.

जास्त घाम येणे कसे टाळावे

आंघोळीसाठी नेहमी थंड किंवा कोमट पाणी वापरा जास्त कडक पाणी वापरू नका.

आंघोळ करताना चांगल्या वायुवीजनासाठी एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा.

आंघोळ केल्यानंतर, शरीराला टॉवेलने न घासता हलक्या हाताने पूर्णपणे पुसून काढा.

आंघोळ केल्यानंतर लगेच जड किंवा घट्ट कपडे घालू नका.

जर तुम्हाला सामान्यपेक्षा जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्या

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;