तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या

तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या

अनेकदा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड घाम येऊ लागतो. ही परिस्थिती अनेकांसोबत घडते. पण तुम्हाला त्यामागील कारण माहित आहे का? जर तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल तर हे कशामुळे होतं? यामागे कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकत का? आणि त्यातून सुटका कशी मिळवावी हे जाणून घेऊयात.

आंघोळीनंतर घाम का येतो?
आंघोळीनंतर घाम येणे ही एक सामान्य स्थिती असू शकते, ज्याची अनेक कारणे असू शकतात. सहसा, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा हा शरीराचा स्वतःचा मार्ग असतो.

गरम पाण्याने आंघोळ करणे
आंघोळीनंतर घाम येणे हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा एक मार्ग असू शकतो. खरं तर, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते. हे तापमान सामान्य करण्यासाठी, शरीर घामवाटे ते बाहेर काढते जेणेकरून जास्तीची उष्णता बाहेर पडू शकेल.

बाथरूममध्ये आर्द्रता जास्त असणे
जर आंघोळ करताना बाथरूममध्ये चांगले वायुवीजन नसेल तर वाढत्या आर्द्रतेमुळे आणि उष्णतेमुळे घाम येऊ शकतो.

हार्मोन्स बदल
काही लोकांना त्यांच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे (जसे की थायरॉईड किंवा ताण) आंघोळीनंतर जास्त घाम येऊ शकतो.

संवेदनशील त्वचा
काही लोकांची त्वचा खूपच संवेदनशील असते, अशा लोकांना आंघोळीनंतर त्वचेचे छिद्र उघडल्यामुळे जास्त घाम येऊ शकतो.

पण याचा परिणाम निश्चितच आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे अनेकदा श्वास फुलणे, दम लागणे किंवा धाप लाण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे आहे.

जास्त घाम येणे कसे टाळावे

आंघोळीसाठी नेहमी थंड किंवा कोमट पाणी वापरा जास्त कडक पाणी वापरू नका.

आंघोळ करताना चांगल्या वायुवीजनासाठी एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा.

आंघोळ केल्यानंतर, शरीराला टॉवेलने न घासता हलक्या हाताने पूर्णपणे पुसून काढा.

आंघोळ केल्यानंतर लगेच जड किंवा घट्ट कपडे घालू नका.

जर तुम्हाला सामान्यपेक्षा जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्या

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही. मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला...
Mumbai News – अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश
केबिनमधून जळण्याचा वास; एअर इंडियाचे चेन्नईला चाललेले विमान मुंबईत माघारी परतले
19 वर्षांच्या पोरानं दाखवला हिसका! पदार्पणातच 61 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत
Thane News – इमारतीच्या 13व्या मजल्यावरून मजूर कोसळला, बदलापुरातील धक्कदायक घटना
BMC Election 2025 – मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचं मोठं पाऊल, निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन
Mumbai News – वरळीतील लोटस जेट्टीवर अस्थि विसर्जनादरम्यान समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू, एक जण जखमी