मला वास्तुतज्ज्ञ बनायचे होते, पण…; वडिलांच्या आठवणींत भावुक झाले CJI गवई

मला वास्तुतज्ज्ञ बनायचे होते, पण…; वडिलांच्या आठवणींत भावुक झाले CJI गवई

नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे शनिवारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि यावेळी ते भावुक झाले. ‘माझ्या वडिलांना नेहमीच वाटायचे की एक दिवस मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होईन. पण आज जेव्हा ते स्वप्न पूर्ण झाले आहे, तेव्हा ते पाहण्यासाठी माझे वडील या जगात नाहीत, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.

‘माझ्या वडिलांना वकील व्हायचे होते, पण त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून त्यांनी माझ्यासाठी हे स्वप्न पाहिले. मला मात्र वास्तुतज्ज्ञ बनायचे होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझे स्वप्न सोडून दिले. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले. पण आज हे यश बघण्यासाठी ते या जगात नाहीत. मात्र, माझी आई आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाीले.

संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…

‘राज्यघटनेच्या तिन्ही घटनांच्या मर्यादा निश्चित केल्या’

सरन्यायाधीशांनी भाषणात राज्यघटनेच्या महत्त्वाच्या धोरणांवरही भाष्य केलं. ‘माझे ऑक्सफर्डचे भाषण कोणी वाचले आहे का? मी त्यात म्हटले होते की, माझ्या कामात न्यायिक सक्रियता (Judicial Activism) कायम राहील. हे संविधानाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्या मर्यादा हिंदुस्थानच्या संविधानाने निश्चित केल्या आहेत. कायदे बनवणे हे कायदेमंडळाचे काम आहे. मग ते संसद असो किंवा विविध राज्य विधानसभा असोत. कार्यकारी मंडळाने संविधान आणि कायद्यानुसार काम करणेच अपेक्षित आहे. जेव्हा संसद किंवा विधानसभेच्या सीमेबाहेर जाऊन कायदा केला जातो आणि यामुळे जेव्हा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन होते, तेव्हा न्यायपालिका त्यात हस्तक्षेप करू शकते, असे गवई यांनी स्पष्ट केले.

असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

न्यायपालिकेने प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नये

दरम्यान, असे असले तरी न्यायपालिकेने प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नये. ‘न्यायालयाने मर्यादेत राहावे. प्रत्येक वेळी सगळ्याच घटनांमध्ये हस्तक्षेप करणे टाळावे, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या
अनेकदा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड घाम येऊ लागतो. ही परिस्थिती अनेकांसोबत घडते. पण तुम्हाला त्यामागील कारण माहित...
पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला; 13 सैनिकांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
Parag Jain – आयपीएस अधिकारी पराग जैन यांची RAW च्या प्रमुखपदी नियुक्ती
आम्ही जे हवं ते करू शकतो! इराण-इस्रायल युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वळवला ‘या’ मुद्द्याकडं मोर्चा
अहमदाबाद दुर्घटनेनंतर जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल; AISATS ने 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ
जनतेला आश्वासनांचं गाजर देणार्‍या सरकारचा गाजरांचा हाल घालून सत्कार! रोहिणी खडसेंचा महायुतीवर निशाणा
फडणवीस-शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही; संजय राऊतांचा घणाघात, मोर्चाबाबत दिली महत्त्वाची माहिती