फडणवीस-शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही; संजय राऊतांचा घणाघात, मोर्चाबाबत दिली महत्त्वाची माहिती
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा आटोपल्यावर महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनामध्ये एक चांगले वातावरण निर्माण होईल. आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगले घडेल. फडणवीस-शिंदे यांनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, असा जबरदस्त घणाघात करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोर्चाबाबत महत्त्वाची माहितीही दिली.
शनिवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांना मोर्चाची वेळ, मार्ग याबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना राऊत म्हणाले, की याबाबत आज-उद्या निर्णय होईल. मोर्चाला अजून 5-6 दिवस आहेत. प्राथमिक भूमिका मांडलेली असून आम्ही एकत्रित मोर्चा काढत आहोत. आधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले, पण आता शनिवारी 5 तारखेला एकत्रित मोर्चा निघेल. या मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पाठिंबा दिला.
शरद पवारांशी काल बोलणे झाले असून त्यांनी आमचा पक्ष मोर्चात सहभागी होईल असे सांगितले. तसेच मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सहकारी मोर्चाला उपस्थित राहीतल असे त्यांनी म्हटले. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनाही त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. काँग्रेस पक्षसुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधात आहे. काँग्रेसचे कार्यकर्तेही या मोर्चामध्ये सहभागी होतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. तसेच शेकाप, डावे पक्ष आणि अन्य काही पक्ष, संघटनांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. कारण महाराष्ट्र, मराठी माणसासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे, याचा आनंद सगळ्यांना आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे नेते सार्वजनिक भेटत आहेत. पूर्वी एक काळ होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते. भेटण्याचे टाळत होते. किंबहुना समोर दिसल्यावर रस्ता बदल होते. पण आता एकत्र भेटत आहेत, एका टेबलावर चहा पित आहेत, हस्तांदोलन करत आहेत, एक गप्पा मारतानाचे व्हिडीओही माध्यमं शेअर करत आहेत, असेही राऊत म्हणाले.
मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत
यावेळी शिवसेना-मनसेच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावरही राऊत स्पष्ट बोलले. आमच्या सगळ्यांची ही भूमिका आहे. मुंबईवरती मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल… तो सातत्याने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. त्यामुळए या सर्व मराठी शक्ती विखुरल्या जाव्यात अशी भाजप आणि खासकरून अमित शहांची भूमिका आहे. आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात ही भूमिका आम्ही अनेकदा जाहीर केली. राज ठाकरे यांनीही जाहीर केली आहे. उद्याचा मोर्चा आटोपल्यावर महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनामध्ये एक चांगले वातावरण निर्माण होईल. आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगले घडले. फडणवीस-शिंदे यांनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही. तसेच मोर्चाचा मार्ग, वेळ, कोणाला आमंत्रित करू शकतो, व्यासपीठावर कोणत्या भूमिका घ्यायच्या, पुढली दिशा काय असेल या संदर्भात दोन्ही पक्षात चर्चा होईल, असेही राऊत यांनी सांगितले.
हिंदी सक्तीविरुद्ध 5 जुलैला एल्गार, मराठीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र मोर्चा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List