‘एसएसएमबी29’ चित्रपटासाठी 50 कोटींचा सेट, हैदराबादेत बनवले हुबेहुब वाराणसी शहर

‘एसएसएमबी29’ चित्रपटासाठी 50 कोटींचा सेट, हैदराबादेत बनवले हुबेहुब वाराणसी शहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘एसएसएमबी29’ ची सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटासाठी राजामौली यांनी आतापर्यंतचा सर्वात महागडा सेट हैदराबादेत बनवला आहे. यासाठी त्यांनी 50 कोटी रुपये खर्च केले असून हैदराबाद शहरात हुबेहुब वाराणसी शहर बनवण्यात आले आहे. वाराणसीसारख्या दिसणारा शहराचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी राजामौली यांचे कौतुक केले आहे.

राजामौली यांनी ‘आरआरआर’, ‘बाहुबली’ यांसारखे दमदार चित्रपट बनवले आहेत. आता त्यांच्या नव्या ‘एसएसएमबी29’ या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटासाठी वाराणसी शहरातील घाट आणि मंदिरावर शूटिंग करायची असल्याने राजामौली यांनी डिट्टो तसेच दृश्य हैदराबादेत तयार केले आहे. या फिल्म सेटसाठी 50 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत असून हा हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा सेट असल्याचे बोलले जात आहे. या सेटची किंमत संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटापेक्षाही जास्त आहे. ‘देवदास’ हा हिंदुस्थानातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता.

हैदराबादेत काशी

एसएस राजामौली यांच्या ‘एसएसएमबी29’ चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. या चित्रपटात देसी गर्ल प्रियांका चोप्रा, महेश बाबू यांसह अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. शूटिंग करण्यासाठी काशीला जाण्यासाठी राजामौली यांनी हैदराबादेत हुबेहुब काशी तयार केली आहे. राजामौली यांनी 2022 मध्ये ‘आरआरआर’ चित्रपट बनवला होता. यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे अभिनेते होते. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील