चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले

चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले

खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून चातकाप्रमाणे वाट पाहूनही पुरेसा पाऊस न आल्याने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 49 हजार 520 हेक्टर क्षेत्रातच पेरणी होऊ शकली. यंदा चार लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे चिंतातुर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 67.3, सावली तालुक्यात सर्वात कमी 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 4 लाख 58 हजार 729 हेक्टर खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत 39.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत 49.520 हजार हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे.

खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. धानाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप पहे टाकले नाही. पुरेसा पाऊस आला नाही तर अंकुर करपून जाईल, याची भीती आहे. त्यामुळे मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, कापूस व सोयाबीन लागवडीचे वेळापत्रक पावसाने बिघडविले. अनेक शेतकरी अजूनही लागवडीचा खर्च जुळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत. पीक कर्ज देण्यास यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची कामगिरी अव्वल राहिली. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका नेहमीप्रमाणे दिरंगाई करीत आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचे काय होणार, याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम
रोज सकाळी-संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो, धूप, अगरबत्ती लावतो. पण तुम्हाला माहितीये का की हेच आपल्या आरोग्यासाठी...
महिलांमध्ये हार्टअटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी कशी काय ?
जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ; फारुख अब्दुल्ला यांचा केंद्राला इशारा
Pandharpur News – पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी वाहतूक, चेंगराचेंगरी रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय
कोल्हापूरात ऊन पावसाचा खेळ; धरणातील विसर्गामुळे पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांची वाढ, 19 बंधारे पाण्याखाली
Mumbai News – महिलेच्या पोटातून काढला तब्बल 10.4 किलो वजनाचा ट्यूमर, सेंट जॉर्जमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
IND Vs ENG 1st Test – कर्णधार बाद झाला अन् Team India ची गाडी रुळावरुन घसरली; पहिला डाव 471 धावांवर आटोपला