अल्प उत्पन्न गटासाठीच्या मुंबईतील 368 भूखंडांवर 30 वर्षे बांधकामच नाही, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

अल्प उत्पन्न गटासाठीच्या मुंबईतील 368 भूखंडांवर 30 वर्षे बांधकामच नाही, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

अल्प उत्पन्न गटाच्या (एलआयजी) घरांसाठी 30 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मुंबईतील 368 भूखंडांवर अद्याप बांधकामच झाले नसल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने म्हाडाचे अध्यक्ष व गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांना याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

अर्जुन सावंत यांनी ही याचिका केली आहे. 1996 मध्ये म्हाडाने तब्बल 368 भूखंड एलआयजीच्या घरांसाठी दिले. अद्याप या भूखंडांचा विकासच करण्यात आलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईतील या भूखंडांचा 30 वर्षे झाली विकासच झाला नाही याची कल्पना केली जाऊ शकत नाही. याचिकेतील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे म्हाडाचे अध्यक्ष व गृहनिर्माण प्रधान सचिवांनी याचे प्रतिज्ञापत्र सादर करायला हवे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 1 जुलै 2025 पर्यंत तहपूब केली.

म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

म्हाडाने या भूखंडांचे वाटप खरेच केले आहे का, यामध्ये कशा प्रकारे कार्यवाही झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे याचा खुलासा म्हाडाने करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

याचिकाकर्त्याचा आरोप

यातील काही भूखंडांचे बेकायदेशीर व्यवहार विकासक करत आहेत. अवैधपणे या भूखंडांचे हस्तांतरण सुरू आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे आरोप गंभीर असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. गोराई येथील एका भूखंडाचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेत ईडी व लाचलुचपत विभागालाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील