ट्रॅकखालची माती वाहून गेली, रुळांना तडे; शेळीपालन करणाऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले शेकडो जीव
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे मोठी रेल्वे दुर्घटना टळली. सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकखालची माती वाहून गेली आणि रुळाला तडे गेल्याने मोठा रेल्वे अपघात होणार होता. मात्र तेथेच शेळ्या चारत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ही बाब लक्षात आली आणि मोठा अपघात टळला.
सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ 16 वर्षांचा सृजन मिश्रा शेळ्या चारत होता. यावेळी रेल्वेस्थानकाजवळील दाबौली वळणावर ट्रॅकखालील माती वाहून गेलेली आणि रुळाला तडे पडलेले त्याला दिसले. याचदरम्यान कानपूर-बलामाऊ पॅसेंजर ट्रेन सफीपूर स्थानकातून निघाली होती. ट्रॅकची स्थिती पाहून सृजनने तात्काळ सतर्कता दाखवत त्याने आपला लाल रंगाचा टी-शर्ट काढला आणि तो हलवू लागला. लाल रंगाचं कापड पाहून ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन थांबवली आणि एक मोठा अपघात टळला.
यानंतर रेल्वे ट्रॅकची माहिती प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॅक दुरुस्त केला आणि त्यानंतर तेथून ट्रेन सोडण्यात आली. सृजनमुळे मोठा अपघात टळल्याने त्याचे संपूर्ण परिसरात खूप कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List