कर्नाटकात आयटी कर्मचाऱ्यांना दहा तास काम

कर्नाटकात आयटी कर्मचाऱ्यांना दहा तास काम

कर्नाटक सरकारने आयटी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास दहा तास करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ओव्हरटाईमसह ही मर्यादा 12 तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रस्तावात सरकारला तीन महिन्यांत ओव्हरटाईम मर्यादा 144 तासांपर्यंत वाढवायची आहे, परंतु या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार असून हा निर्णय म्हणजे सरकारकडून कर्मचाऱ्यांवर गुलामगिरी थोपवण्याचाच प्रकार आहे, असा गंभीर आरोप कर्मचारी वर्गांनी केला आहे. जास्त वेळ काम केल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल, असे कर्नाटक आयटी युनियनने म्हटले आहे.

आंध्र प्रदेशात झाली सुरुवात

चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेश सरकारनेही कंपन्यांना दररोज 9 तासांऐवजी 10 तास काम करण्याची याआधीच परवानगी दिली आहे. तसेच महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आहे. आंध्र प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु सरकारच्या या निर्णयाला कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल