हिंदी भाषा सक्तीची करू नका; शरद पवार यांची प्रतिक्रिया, महापालिका निवडणुकीबाबत मोठं भाष्य

हिंदी भाषा सक्तीची करू नका; शरद पवार यांची प्रतिक्रिया, महापालिका निवडणुकीबाबत मोठं भाष्य

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी नवा जीआर काढून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करून त्यात हिंदीचा समावेश केला. तिसरी भाषा म्हणून हिंदीव्यतिरिक्त भाषा शिकायची असल्यास 20 विद्यार्थ्यांचा गट असणे आवश्यक करण्यात आले आहे. हिंदी भाषेसाठी मात्र ही अट नाही. त्यामुळे हिंदीव्यतिरिक्त भाषेला शिक्षक मिळणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. ही एक प्रकारे हिंदीची सक्तीच असून यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हिंदी सक्तीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करू नका. तुम्हाला जे हवे ते करा पण हिंदी भाषा सक्ती करू नका. पालकांनी जे मार्गदर्शन केले आहे त्या प्रमाणे निर्णय घ्या, असेही त्यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी हिंदी भाषेचा द्वेष करणेही विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे म्हटले. हिंदुस्थानातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही, असेही ते म्हणाले.

केंद्राच्या नव्या राष्ट्रीय धोरणाला हरताळ, राज्य सरकारच्या खोटारडेपणामुळे ‘हिंदी’भाषा पहिलीपासून अनिवार्यच!

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले. पुढील तीन महिन्यात निवडणुका होतील असे त्यांनी म्हटले. तसेच महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

महापालिका एकत्र लढण्याची इच्छा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता निवडणुका लांबणार नाहीत. साधारण तीन महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, असे पवार म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत अद्याप चर्चा झालेली नाही. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर छोटे पक्ष एकत्र बसू आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाता येईल का याबाबत विचार करू. आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा आहे. तसेच मुंबईमध्ये आमच्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल, अशी स्पष्ट भूमिका पवारांनी मांडली.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये ठाण्यातल्या अब्दुल्लाचे काय काम? संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण
अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी...
तुम्ही पण अशीच चपाती भाजता का?वाढेल कॅन्सरचा धोका; लगेच बदला ही सवय
Weight Loss Recipe – लहानांसह मोठ्यांना आवडेल असा सकस नाचणीचा उपमा, वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त
IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?
Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी शिकवला धडा
लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार
Photo : गळ्यात रुद्राक्षाची माळ, सफेद साडी नेसून केदारनाथला पोहोचली अमृता, शेअर केले सुंदर फोटो