Monsoon Street Food- घरी केलेली खेकडा भजी कुरकुरीत होत नाही, मग या टिप्स फाॅलो करा!

Monsoon Street Food- घरी केलेली खेकडा भजी कुरकुरीत होत नाही, मग या टिप्स फाॅलो करा!

चिंब भिजलेल्या पावसातून घरी आल्यावर, गरमागरम खेकडा भजी तुमच्या समोर कुणी आणून ठेवली तर, तुम्ही नक्कीच खुश व्हाल. परंतु घरी केलेली खेकडा भजी ही अनेकदा नरम पडते. खेकडा भजी करताना, आपण कितीही काळजी घेतली तरी, घरची खेकडा भजी ही कुरकुरीत होत नाही. हाॅटेलसारखी आणि स्ट्रीट फूड सारखी कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी फक्त हा एक पदार्थ पिठ कालवताना मिसळा. खेकडा भजी होईल मस्त कुरकुरीत आणि क्रंची…

खेकडा भजी रेसिपी

साहित्य-

5 ते 6 मोठे कांदे
1 कप बेसन कमी जास्त
1/4 कप तांदळाचे पिठ
2 टेबलस्पून तिखट
1/2 टीस्पून हळद
1/4 टीस्पून ओवा
1/2 कप कोथिंबीर चिरलेली
4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
1 चिमूट खाण्याचा सोडा
आवश्यकतेनुसार पाणी
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
1 टेबलस्पून गरम तेल पीठात घालायला
2 टी स्पून धणे (कुस्करुन घ्यावेत)

कृती-

कांदे सोलून घ्या व त्यांचे उभे पातळ, काप करा..चिरलेल्या कांद्याची प्रत्येक पात वेगळी करावी.

कांद्यांना नंतर मीठ, हळद, तिखट लावून किमान अर्धा ते पाऊण तास झाकुण ठेवावे.

मीठ लावल्याने कांद्याला पाणी सुटते.

कांद्याला पाणी सुटल्यानंतर यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, चिमूटभर सोडा, ओवा,गरम तेल घालून चांगले मिक्स करून घ्या.

खेकडा भजी करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये शक्यतो पाणी घालू नका.

एखादा चमचा पाणी ठिक आहे, परंतु खेकडा भजीत तुम्ही पाणी घातले तर ती कुरकुरीत होणार नाहीत.

तेल गरम झाले की त्यात भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे मोकळे भजी सोडावीत. व चांगले खमंग, सोनेरी रंगावर तळून घ्यावीत.

खेकडा भजी करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

खेकडा भजी करताना कांदा जितका पातळ चिरता येईल तितका पातळ चिरावा. म्हणजे तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही.

कमी खर्चात चटपटीत पाणीपुरी करा घरच्या घरी, आता बाहेर जाण्याची गरज नाही!

कांदा पातळ असेल तितकी भजी अधिक कुरकुरीत होईल.

कोणतीही भजी कुरकुरीत होण्यासाठी, तेल खूप कडकडीत नसावे. मध्यम आचेवर भजी तळल्याने, ती चविष्ट आणि कुरकुरीत होईल.

तुम्ही कोणतीही भजी करताना, त्यात किमान 2 ते  3 चमचे तांदळाचे पीठ घाला. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी क्रिस्पी होतात.

भजी तळताना अनेकदा तेल फसफसते. तसेच तेल जास्त खेचले जाते. अशावेळी तेलात थोडे मीठ घालावे. त्यामुळे जास्त तेल शोषले जाणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण
अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी...
तुम्ही पण अशीच चपाती भाजता का?वाढेल कॅन्सरचा धोका; लगेच बदला ही सवय
Weight Loss Recipe – लहानांसह मोठ्यांना आवडेल असा सकस नाचणीचा उपमा, वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त
IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?
Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी शिकवला धडा
लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार
Photo : गळ्यात रुद्राक्षाची माळ, सफेद साडी नेसून केदारनाथला पोहोचली अमृता, शेअर केले सुंदर फोटो