लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकला कारची जोरदार धडक झाली आणि यात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकही अनियंत्रित झाला आणि जवळच्या शेतात उलटला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वर ही घटना घडली. झारखंडमधील 9 जण लग्नसमारंभासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. लग्न समारंभ आटोपून सर्वजण आपल्या गावी परतत होते. यादरम्यान पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वरील बलरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिली.

कारला वाचवण्याच्या नादात ट्रकही अनियंत्रित होऊन उलटला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील