IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

इंग्लंडमधील हेंडिग्ले येथील लीड्सच्या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (20 जून 2025) सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती.

हिंदुस्थानातून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डान घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात भयंकर अपघात झाला होता. या अपघातात 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरले. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच एक मिनिटांच मौन सुद्धा पाळलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल