IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

इंग्लंडमधील हेंडिग्ले येथील लीड्सच्या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (20 जून 2025) सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती.

हिंदुस्थानातून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डान घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात भयंकर अपघात झाला होता. या अपघातात 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरले. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच एक मिनिटांच मौन सुद्धा पाळलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान