नाझरे धरणातील पाणीसाठा वाढला; मान्सूनपूर्व पावसामुळे कहा नदी वाहू लागली

नाझरे धरणातील पाणीसाठा वाढला; मान्सूनपूर्व पावसामुळे कहा नदी वाहू लागली

जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव व इतर 36 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणातील पाणीसाठ्यात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी असून 200 दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा मानला जातो. यापूर्वी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपून मृत पाणी साठ्यातील पाणी वापरले जात होते. मात्र, आता पाणीपातळीत वाढ होऊन 240 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या धरणावर पिण्याच्या पाण्याच्या व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना अवलंबून आहेत. सासवड परिसरातील गराडे, नारायणपूर, चांबळी या परिसरात मान्सूनपूर्व पाऊस भरपूर झाल्याने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी चार दिवसांपूर्वीच नाझरे धरणापर्यंत पोहोचले. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सासवड ते जेजुरीतील नाझरे धरण हे अंतर साधारणतः 20 किलोमीटर आहे. यापूर्वी नदीचे पात्र कोरडे पडले होते, आता कऱ्हा नदी वाहत असल्याने नदीच्या पात्राशेजारील वाटेत असणारे सर्व नाला बंडिंग, पाझरतलाव भरले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर नाझरे धरण लवकर भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सासवड परिसरात पुरेसा पाऊस झाल्यावर कऱ्हा नदीतून नाझरे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येते व धरण पूर्ण क्षमतेने भरते. जेजुरीत दररोज हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास औद्योगिक वसाहतीलाही अनेक वेळा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. धरणात पाणीसाठा वाढत असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

नाझरे धरण लवकर भरण्याची शक्यता
मागील वर्षी मे महिन्यात नाझरे धरण कोरडे ठणठणीत पडले होते. त्यातील गाळही मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. यंदा मात्र धरणात 195 दशलक्ष घनफूट एवढा मृत पाणीसाठा शिल्लक आहे. आता कन्हा नदीचे पाणी नाझरे धरणात पोहोचल्याने पाणीसाठा वाढत आहे. पुरेसा पाऊस झाल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता आहे, असे नाझरे धरणाचे शाखा अभियंता अनिल घोडके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनुष्काने मिठी मारताच विराट बाळासारखा ढसाढसा रडला, RCB च्या विजयानंतरचे भावनिक क्षण व्हायरल अनुष्काने मिठी मारताच विराट बाळासारखा ढसाढसा रडला, RCB च्या विजयानंतरचे भावनिक क्षण व्हायरल
आयपीएल 2025 चा अंतिम सामना (3 जून 2025) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात...
Ratnagiri News – मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा जहाजाचे लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे
बोरिवली – ठाणे टनेल प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची हमी द्या, शिवसेनेची MMRDA कडे मागणी
IPL 2025 Final – अठरा वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा संपली, पंजाबचा पराभव करत RCB आयपीएलची नवीन चॅम्पियन
‘तिने चित्रपट साइन केला की तो बंद पडायचा’, बॉलिवूड अभिनेत्रीला ‘पनौती’ म्हणायचे सगळे,पण एका चित्रपटाने बदललं नशीब
युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला, 1100 किलो स्फोटकांनी क्रिमियन पूल उडवला
अखेर राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली, 2 विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर CM स्टॅलिन यांचा टोला