लाडकी बहीण, शेतकऱ्यांची फसवणूक, या अवकाळी सरकारचा धिक्कार; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

लाडकी बहीण, शेतकऱ्यांची फसवणूक, या अवकाळी सरकारचा धिक्कार; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेचे आश्वासन, प्रत्येक कुटुंबाला 2 मोफत सिलेंडर निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने यांच्याशी या सरकारला काही देणेघेणे नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी स्थापन झालेल्या या अवकाळी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “महायुती सरकारने निवडणुकीत पैसा फेक, तमाशा देख, हा खेळ खेळाला आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केलं नाही. त्यावेळी त्यांची भावना महिलांच्या सबलीकरणाची नव्हती, तर केवळ निवडणूक ही त्या मागची भावना होती. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचंही आश्वासन दिलं होतं, ती देखील त्यांची चूक आहे, असं ते म्हणतील. इतकीच प्रतीक्षा आहे.”

ते म्हणाले की, “लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेचे आश्वासन, प्रत्येक कुटुंबाला 2 मोफत सिलेंडर निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने त्यांचे हवाई गुब्बारे होते. आज सर्वसामान्यांचे जे हाल आहेत, शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, याचं काही देणंघेणं महायुती सरकारला नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे सत्तापिपासू विचारांचं हे अवकाळी सरकार महाराष्ट्रात आहे, याचा आम्ही धिक्कार करतो.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी
आपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही...
बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार
राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली
महायुती सरकारने मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल
फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
TMC खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात अडकल्या, 65 वर्षीय नेत्याशी बांधली साताजन्माची गाठ!
1200 रुपये किलोची काजु कतली घेतली पण कैद्यांना मिळालीच नाही! IG जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप