वजन कमी करण्यासाठी ही फळे आहेत वरदान, वाचा सविस्तर

वजन कमी करण्यासाठी ही फळे आहेत वरदान, वाचा सविस्तर

अलीकडे आपल्या खाण्या पिण्याच्या विचित्र सवयींमुळे वाढत्या वजनाच्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. परंतु या बेढब शरीरामुळे आपला आत्मविश्वासही कमी होताना दिसतो. त्यामुळेच अनेकदा आपण न्यूनगंडाचे शिकार होतो. बेढब शरीरामुळे आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच बेढब शरीराला उत्तम निरोगी बनविण्यासाठी वजन कमी करणं हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करणं हा एक महत् प्रयास असतो. या प्रयासाला सामोरं जाताना, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या थकायला होतं. तुम्हीही वजन कमी करण्याच्या मार्गावर असाल तर ही फळे तुमच्यासाठी आता वरदान ठरतील.

किवी
किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. फायबरचे प्रमाण भरपूर मात्रेमध्ये असल्यामुळे किवी वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे.
अर्थरायटीसचा त्रास असल्यांनी जर नियमित किवी खाल्ले तर त्यांना फायदा होतो. तसेच शरीरावरील सूज कमी होईल.

 

सफरचंद
सफरचंद हे फळ वजन कमी करण्यासाठी पूरक मानले जाते. कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्याकारणाने सफरचंद हे वजन कमी करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. सफरचंदामध्ये असणारे पोषक गुणधर्म हे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जातात. आजारपण दूर करण्यासाठी सफरचंद हे फळ रामबाण असल्याचे म्हटले जाते. सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.

 

टरबूज
टरबूज हे फळ अधिक पाण्याची मात्रा असल्यामुळे, कॅलरी कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते. शिवाय टरबूजामध्ये असलेले पोटॅशियम हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे.

(वरील कोणतेही उपाय करताना आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय? भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं...
IMD Weather Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, आयएमडीचा रेड अर्लट
ममता कुलकर्णीनंतर ही स्टार अभिनेत्री साध्वी बनणार? इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यास मिळतील दुप्पट फायदे
देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?
पॅकेटमधील दूध कसे प्यावे उकळून की कच्चे? फायदेशीर काय?
Photo – तू हुस्न परी…