क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 जूनपासून मराठवाड्यात जन आंदोलन
सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे सरकार ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.
5 जून ते 12 जून या कालावधीत हे आंदोलन उभारले जाणार असून सरकारला क्या हुआ तेरा वादा? या शिषर्काखाली जाब विचारून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, नेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List