गिरीश महाजन यांची भाषा त्यांच्यासह पक्षाला घेऊन बुडणार; संजय राऊत यांनी सुनावले

गिरीश महाजन यांची भाषा त्यांच्यासह पक्षाला घेऊन बुडणार; संजय राऊत यांनी सुनावले

शिवसेना पवित्र विचारांनी पवित्र कार्यासाठी स्थापन झाली आहे. शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष जमीनीवर आहे का, याचा आधी अभ्यास करावा. गिरीश महाजन यांच्या 10 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवणे त्यांना शक्य नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. तसेच आधीचा आणि आताच भाजप यातील फरक स्पष्ट करत भाजपला चांगलाच आरसा दाखवला.

गिरीश महाजन यांचा पक्ष जागेवर आहे का? मिंधे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते हा त्यांचा पक्ष आहे काय? महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व भ्रष्टाचारी, व्याभिचारी लोकांना एकत्र घेत झालेला पक्ष म्हणजे आजचा भाजप असे दिसत आहे. एकेकाळी भाजप हा पवित्र, नीतीवान, हिंदुत्ववादी,सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. त्या पक्षाचे नेतृत्व, अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालाकृष्ण आडवाणी यांनी सांभाळथ पक्ष वाढवला. अशा या पक्षाची सूत्र आज दलाल, भ्रष्ट, ठेकेदार यांच्याकडे आहे. असे असताना ते आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. ही त्यांची भाषा आहे, मुळात त्यांचा पक्ष जमीनीवर आहे का, हे त्यांनी पाहावे, असे संजय राऊत यांनी सुनावले.

विकत घेतलेले किंवा दबाव टाकून घेतलेले बाहेर काढले तर त्यांचा पक्ष कुठे आहे? त्यांच्या हातात पोलीस, सरकारी यंत्रणा आहेत. टेंजरबाजी, खंडणी यातून आलेला प्रचंड पैसा आहे. त्याच्या जोरावर लोकांना धमकावणे, पक्ष फोडणे असे त्यांचे कारस्थान सुरू आहे. त्या कामासाठी नेमलेल्या दलालांमधील गिरीश महाजन हे एक आहेत. मात्र, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल तेव्हा पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, असे ते म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री असताना यांच्या चौकशा सुरू असताना ते पक्ष बदलण्यासाठी तयार होते. त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर प्रकरणांच्या चौकशा सुरू असताना त्यांचे निरोप येत होते. आपण राजकारणातून बाहेर पडतो, आपण शांत बसतो अशा विनवण्या ते करत होते. ते डरपोक आणि गांडू लोकं आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना नाडी बांधायला शिकवले. राजकारणात त्यांना ओळख मिळवून दिली. त्या शिवसेनेला आज ते जमीनदोस्त करण्याची भाषा वापरत आहेत, त्यांना लाज वाटायला हवी. गिरीश महाजन जी भाषा वापरत आहे, तीच भाषा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला घेऊन बुडणार आहे. शिवसेना कधीही संपणार नाही. अनेकांना शिवसेना सोडली आणि शिवसेना संपवण्याची भाषा केली, ते संपले पण शिवसेना संपली नाही. अमित शहा यांनी शिवसेना संपवण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. महाराष्ट्रच संपवण्याची त्यांची इच्छा आहे. गिरीश महाजन हे मराठी आणि महाराष्ट्रद्रोही असून महाराष्ट्र संपवायला निघालेल्यांचे ते हस्तक आहेत. पवित्र विचार आणि कार्यासाठी शिवसेना स्थापन झाली आहे. गिरीश महाजन यांच्या 10 पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवणे शक्य होणार नाही. 5, 25 माणसं फोडणे म्हणजे पक्ष संपवणे नव्हे. गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे, असेही त्यांनी सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त आणि भ्रष्टारमुक्त भारत ची घोषणा करत होते. मात्र, त्यांच्या काळातच काँग्रेस झपाट्याने वाढली आहे. तसेच त्यांच्या काळातच भ्रष्टारातही वाढ झाली आहे. काँग्रेसच्या खासदारांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवत त्यांना देशाची भूमिका मांडावी लागत आहे. त्यांच्याकडे योग्य असे नेतृत्व नाही. अशाप्रकारची नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला, लेकीला आईच्या मृत्यूचा दाखला मिळेना अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला, लेकीला आईच्या मृत्यूचा दाखला मिळेना
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला असला तरी त्यांची कन्या सूची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा...
रस्त्याची दुरावस्था प्रवाशांच्या जीवावर! एसटी बस घसरून उलटल्याने 15 प्रवासी जखमी
पाकिस्तानसाठी हेरगिरी; आणखी एक यूटय़ूबर अटकेत
भूसंपादनाला संमती देणारे 60 टक्के शेतकरी कोण? पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधितांचा प्रशासनाला जाब
पालिकेतील भाजपची गुंडागर्दी थांबेना; भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा छळ, महिला आयोगाकडे तक्रार
लग्नाच्या 35 दिवसांतच हुंडाबळी, नागपुरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्याला परदेशात जाण्यास परवानगी, गुजरात हायकोर्टाचा निर्णय