नदीकिनारी बनवलेली रील अखेरची ठरली, मग अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या अन् 6 जणी बुडाल्या

नदीकिनारी बनवलेली रील अखेरची ठरली, मग अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या अन् 6 जणी बुडाल्या

अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा मुली यमुना नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यापैकी चौघींचा मृत्यू झाला तर दोघींची प्रकृती गंभीर आहे. वाचवण्यात आलेल्या दोन मुलींवर एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील स्वामी नगला गावाजवळ ही घटना घडली.

उकाड्याने हैराण झाल्याने सर्व मुली यमुना नदीवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. अंघोळीला जाण्यापूर्वी सर्व मुलींनी नदीकिनारी रील बनवली. यानंतर सर्वजणी पाण्यात उतरल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या.

ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य राबवेपर्यंत चौघींचा मृत्यू झाला होता. दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुलींच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी
आपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही...
बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार
राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली
महायुती सरकारने मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल
फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
TMC खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात अडकल्या, 65 वर्षीय नेत्याशी बांधली साताजन्माची गाठ!
1200 रुपये किलोची काजु कतली घेतली पण कैद्यांना मिळालीच नाही! IG जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप