स्थानिकांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या; मुंबईतील प्रस्तावित जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

स्थानिकांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या; मुंबईतील प्रस्तावित जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून मगच त्याविषयी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

आपल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी लिहिलं आहे की, “अलीकडेच माझी कुलाबा परिसरातील रहिवाशांशी भेट झाली, तेव्हा गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब ह्यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत त्यांची मते व त्यांना वाटणाऱ्या चिंता मला समजल्या. या प्रस्तावित जेट्टीबाबात स्थानिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता, त्यांना विश्वासात न घेता काँक्रीटचे विद्रूप बांधकाम तिथे केले जाणार आहे, ज्यामुळे या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसराचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. असे घडण्याआधी, आपण कृपया इथल्या रहिवाशांचे म्हणणे ऐकावे व योग्य निर्णय घ्यावा, अशी मी आपणास नम्र विनंती करतो.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी
आपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही...
बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार
राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली
महायुती सरकारने मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल
फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
TMC खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात अडकल्या, 65 वर्षीय नेत्याशी बांधली साताजन्माची गाठ!
1200 रुपये किलोची काजु कतली घेतली पण कैद्यांना मिळालीच नाही! IG जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप