अशोक सराफ यांच्या भीषण अपघाताचा तो प्रसंग; सीटसकट गाडीबाहेर फेकले गेले, गाडीचा चेंदामेंदा झालेला..

अशोक सराफ यांच्या भीषण अपघाताचा तो प्रसंग; सीटसकट गाडीबाहेर फेकले गेले, गाडीचा चेंदामेंदा झालेला..

17 एप्रिल 1987.. ‘बडे घर की बहू’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग आटपून अशोक सराफ यांना ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी कोल्हापूरला जायचं होतं. काम संपल्यानंतर रात्रीच्या दहा-साडेदहा वाजता ते गाडीत बसले. तेव्हा ते प्रचंड दमलेले होते. त्यामुळे थकव्याने कधी झोप लागली त्यांना कळलंच नाही. त्यानंतर जाग आली तेव्हा ते थेट पुण्याच्या संचेती हॉस्पिटमध्ये होते. तारीख होती 20 एप्रिल 1987. सुरुवातीला अशोक सराफ यांना काहीच नीट आठवत नव्हतं. नंतर जेव्हा एकेकाने हकिकत सांगितली, तेव्हा पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. यावेळी त्यांना त्यांच्या गाडीचा फोटोसुद्धा दाखवण्यात आला होता. चोळामोळा करून बाजूला फेकून दिलेला कागद कसा दिसतो, तशी ती गाडी दिसत होती. अपघाताच्या या प्रसंगाचा उल्लेख अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात केला आहे.

खेड-शिवपूरजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास अशोक सराफ यांच्या ॲम्बेसेडर गाडीचा अपघात झाला होता. त्यांच्या गाडीसमोर ट्रेलर एसटी जात होती. ट्रेलर एसटी म्हणजे एकाला एक अशा जोडलेल्या दोन एसटी बस. ड्रायव्हरला ते समजलं नाही. आपल्यासमोर एकच बस आहे असं वाटून तो ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात अंदाज चुकला आणि त्याच वेळी समोरून एक ट्रक आला. अशोक सराफ यांची गाडी आणि ट्रक एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात अशोक सराफ यांचा ड्रायव्हर वाचू शकला नव्हता. तर खुद्द अशोक सराफ हे गाडीबाहेर फेकले गेले होते, सीटसकट. बहुधा म्हणूनच मी वाचलो असणार, असं ते सांगतात. कारण लोकांना सापडले तेव्हा गाडीच्या सीटवरच ते बेशुद्धावस्थेत होते.

अपघातानंतरही बराच वेळ अशोक सराफ उपचाराविना

या अपघातानंतर एका बंगाली माणसाने आणि त्याच्याबरोबरच्या काही जणांनी अशोक सराफ यांना उचललं आणि एसटी बसमधून ससून हॉस्पिटलला नेलं. ससून हॉस्पिटलमध्ये बराच वेळ कोणतेही उपचार न मिळता ते स्ट्रेचरवर तसेच पडून होते. तोवर अशोक सराफ यांचा अपघात झाल्याची बातमी सगळीकडे पसरली होती आणि रुग्णालयाबाहेर गर्दी जमू लागली होती. त्याचवेळी रुग्णालयात कल्पना कौशल नावाची एक मुलगी ससून हॉस्पिटलवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी तिथे आली होती. तिला स्ट्रेचरवर अशोक सराफ दिसले आणि म्हणाली, “ये अशोक सराफ है. इन्हें ट्रिटमेंट नहीं मिल रही.” पुढे काय करावं ते न सुचल्याने तिने पूना गेस्ट हाऊसला फोन लावला.

अजय सरपोतदार यांनी वाचवले प्राण

त्या मुलीचा फोन अभिनेते सूर्यकांत यांनी घेतला आणि अशोक सराफ यांच्या अपघाताचा निरोप चारुदत्त सरपोतदारांना दिला. त्यानंतर चारुदत्त यांनी अजय सरपोतदार यांच्या घरी फोन केला. बातमी कळल्यावर अजय ताबडतोब ससूनला आले आणि त्यांनीच अशोक सराफ यांना संचेतीमध्ये हलवलं. कारण आणखी काही तास जर मी तिथेच पडून राहिलो असतो, तर माझं काही खरं नव्हतं, असं त्यांनी आत्मचरित्रात म्हटलंय. अजय नसता तर कदाचित मी तेव्हा वाचलो नसतो, असंही त्यांनी लिहिलंय. कारण अपघाताची केस म्हणून ससूनमध्ये अशोक सराफ यांना कोणी हात लावू देत नव्हते.

ससूनमध्ये पोहोचल्यानंतर पोलीस अजय यांना आत जाऊ देत नव्हते. कितीही विनंती केली तरी पोलीस ऐकेनात म्हटल्यावर त्यांनी कसलीही पर्वा न करता माझ्या जबाबदारीवर मी अशोक सराफ यांना घेऊन जातो, काय करायचंय ते करा.. असं म्हणून एका कोऱ्या कागदावर सही केली होती. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याची केस नंतर अजय पुढे कितीतरी वर्ष लढत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची...
‘…मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रींच्या ताटात जेवणारा असू दे…,’ काय म्हणाल्या चित्रा वाघ
‘हम आपके हैं कौन’च्या शूटिंगचा BTS व्हिडिओ व्हायरल, सीन संपताच माधुरीचा सलमानवरचा राग; लक्ष्मीकांत बैर्डेही चिडले
ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं काय?, कसे होते निदान? काय आहेत उपचार?
मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका; उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण
Hingoli News – चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार टिप्परला धडकली, तिघांचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी
Mumbai Crime News – शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चेंबूरमधील धक्कादायक घटना