भटक्या श्वानांची दहशत; एका वर्षात 14 हजार डोंबिवलीकरांना कुत्र्यांचे चावे, तीन वर्षांत 51 हजार नागरिकांचे लचके तोडले

भटक्या श्वानांची दहशत; एका वर्षात 14 हजार डोंबिवलीकरांना कुत्र्यांचे चावे, तीन वर्षांत 51 हजार नागरिकांचे लचके तोडले

>> आकाश गायकवाड

कल्याण-डोंबिवलीत भटके श्वान नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भटक्या श्वानांची दहशत इतकी वाढली आहे की, गेल्या वर्षात 14 हजार जणांचे कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. तर गेल्या तीन वर्षांत 51 हजार नागरिकांचे लचके तोडले आहेत.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे 80 हजारपेक्षा अधिक भटके श्वान आहेत. श्वान चावल्याच्या घटना रात्रीच्या वेळी अधिक आहेत. चालताना, दुचाकी किंवा रिक्षातून प्रवास करताना भटक्या श्वानांच्या हल्ल्याला नागरिक बळी पडत आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये रात्रीचे फिरणे धोकादायक बनले आहे. शहरातील रस्ते, कचराकुंड्या, वसाहती, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चक्कीनाका, नेवाळी नाका, पत्री पूल, कल्याण पश्चिमेतील बैल बाजार, वाडेघर, खाडी परिसर, मुरबाड नाका, टिटवाळा, बल्याणी, डोंबिवलीतील एमआयडीसी भाग, मानपाडा, नांदिवली याठिकाणी सर्वात जास्त भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.

मोफत उपचार केंद्रे
श्वानदंश झाल्यास महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय तसेच विविध आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी मोफत लसीकरण आणि उपचाराची सोय करण्यात आली आहे. 2022-23 मध्ये 16,414 नागरिकांना, 2023-24 मध्ये 20,390 नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली.

44 हजारांचे निर्बिजीकरण
भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची मोहीम केडीएमसी सातत्याने राबवत आहे. 2022-23 मध्ये 14,108, 2023-24 मध्ये 14,410 आणि 2024-25 मध्ये 15,445 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update :  प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी IMD Weather Update : प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून...
मुंबापुरीच्या सागरात अक्रित घडणार, समुद्रात येणार…नेमका इशारा काय?
टीव्ही मालिकांतील या 7 सुंदर कजाग सासवा पाहा, सुनांच्याही वरचढ त्यांचे ग्लॅमर !
‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी किती पैसे घेते माहितीये का? ऐकून बसेल धक्का
वयाच्या 15व्या वर्षी गुपचूप रेड लाइट एरियात जायची ही अभिनेत्री, शूट केला अश्लील सीन; 4 वर्षांत सोडलं बॉलिवूड
Kolhapur News – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…; गीत गातच माजी शिक्षकाने घेतला शेवटचा श्वास,
Jalna News – धुळे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडीला अपघात, एक जागीच ठार; एक गंभीर जखमी