Hingoli News – चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार टिप्परला धडकली, तिघांचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् कार थेट टिप्परवर धडकली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून कारचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात टोकाई टोकाई फाट्यावर ही घटना घडली.
कौटुंबिक कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. कार चालकाला अंदाज न आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. यात कारचा चक्काचूर झाला.
अपघातात दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List