मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका; उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण
मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं होतं. पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने रेड अलर्टही दिला होता. मात्र 27 आणि 27 मे रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली असून नागरिकांना उष्णेतेचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी कुलाबा येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सियस तर, सांताक्रूझ येथे 33.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं आहे. पावसाअभावी उष्णतेत अधिक वाढ झाली असून आद्रतेमुळे किमान तापमानातही वाढ झालेली आहे. यातच आज कुलाबा येथे कमाल तापमान 27.8 अंश सेल्सियस तर, सांताक्रूझ येथे 27.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं आहे. हे तापमान सरासरी पेक्षा जास्त नसलं तरी 24 तासात चार अंशाने तापमानात वाढ झाली आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये येत्या काही दिवसात पावसाची शक्यात कमी असल्याचं हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List