‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल

‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकल्पाबाबत निर्णय देत राज्यातील मोठा घोटाळा उघड केला आहे, याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच घोटाळा आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशी घोषणा करणारे फडणवीस या संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

एका प्रकल्पातून संबंधित खात्याचा मंत्री 3 हजार कोटी रुपये मिळवतो, ही राज्याची लूट आहे. मेघा इंजिनीअरिंग कंपनीने निवडणुकीपूर्वी भाजपला इलेक्ट्रोरल बॉण्डद्वारे हजारो कोटी रुपये दिले होते. त्यांनी भाजपला सर्वाधिक निधी दिला होता. याच कंपनीने मिंधे यांनाही शेकडो कोटी निवडणुकीपुर्वी दिले होते. त्याच पैशांच्या जोरावर आमदार, खासदार आणि यंत्रणा विकत घेत निवडणुका जिंकण्यात आल्या. त्याची परतफेड म्हणून 14 हजार कोटींचे टेंडर देण्यात आले. हे मेघा इंजिनीअरिंग प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने राज्यातील भष्टाचार देशासमोर आणला आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता.

हा मोठा भ्रष्टाचार आहे. मेघा इंजिनीअरिंगकडून निवडणुकीपुर्वी हजारो कोटी रुपये घेण्यात आले. आता त्यांना नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे देण्यात येत आहेत. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात तुरुंगात जाण्यासाठी योग्य असे अनेक नेते आहेत. मात्र, त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे फडणवीस सांगत आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळातच अनेक भ्रष्टाचारी आहेत. राज्यात याआधाही काही आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे काँग्रेसने घेतले होते. राज्याची ती पंरपरा आहे. मात्र, फडणवीस फक्त घोषणा करत आहेत. कारवाई काहीही होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. धुळ्यात अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या खासगी सचिवांकडे सापडलेल्या रोकडप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या फक्त घोषणा करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा आता होणार धारावीचा पुनर्विकास; असा बदलणार चेहरामोहरा
मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा...
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
‘अजित पवार तुमचा माणूस…’, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा अमोल मिटकरींवर घणाघात
vastu tips: वास्तूनुसार तुमच्या स्वयंपाकघर ‘या’ रंगांनी सजवा, घरातील सदस्य राहातील हेल्दी….
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा
दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा
Mumbai News – मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, एका प्रवाशाला अटक