संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम, होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग – हर्षवर्धन सपकाळ

संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम, होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग – हर्षवर्धन सपकाळ

भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे हे सातत्याने त्यांच्या व भाजपा नेत्यांच्या विधानातून उघड होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपा नेते 400 जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संविधानाची समिक्षा केली पाहिजे असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहताना विवेक देबरॉय यांनीही संविधान बदलण्याची गरज आहे असे उघडपणे म्हटले होते. भाजपा व संघ परिवारातून अशा विधानाचे खंडनही केले जात नाही. संविधान, तिरंगा झेंडा हे संघाला मान्य नाही त्यामुळे ते बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे तो आजही कायम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाश्त्यात बनवा ‘हे’ 5 आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ, चवीसोबतच मिळेल पोषणही नाश्त्यात बनवा ‘हे’ 5 आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ, चवीसोबतच मिळेल पोषणही
नाश्ता हा दिवसातला सगळ्यात पहिला आहार असतो. दिवसाची सुरूवात करताना नाश्ता हा पोटभर करायचा असतो आणि त्याचवेळी पौष्टिक असणं फार...
‘मूड’ नेहमी खराब राहतो? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं आणि उपाय
तुमचा मुलगा योग्य वेळी झोप घेत नाही? जाणून घ्या कारण आणि उपाय
जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 550 हून अधिक भाविक जखमी
‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन
Pandharpur Wari 2025 – काटेवाडीत रंगले श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण
सकाळी उठल्यावर मान दुखतेय? मग झोपताना नक्की करताय ही गंभीर चूक