समानता आणि धर्मनिरपेक्षता भाजप- संघाला बोचते, राहुल गांधी यांची टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपला व संघाला फटकारले आहे.
RSS का नक़ाब फिर से उतर गया।
संविधान इन्हें चुभता है क्योंकि वो समानता, धर्मनिरपेक्षता और न्याय की बात करता है।
RSS-BJP को संविधान नहीं, मनुस्मृति चाहिए। ये बहुजनों और ग़रीबों से उनके अधिकार छीनकर उन्हें दोबारा ग़ुलाम बनाना चाहते हैं। संविधान जैसा ताक़तवर हथियार उनसे छीनना इनका…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 27, 2025
”RSS चा पर्दाफाश झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचे धडे संविधानातून दिले जातात त्यामुळे ते त्यांना बोचते. संघ व भाजपला संविधान नको, मनुस्मृती हवी आहे. हे बहुजनांना आणि गरिबांचे सर्व अधिकार काढून घेऊन त्यांना गुलाम बनवायचे आहे. संविधानासारखे ताकदवर शस्त्र त्यांच्याकडून हिसकावून घेणे हा त्यांचा अजेंडा आहे”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप संघावर टीका केली.
यासोबतच संघाचे हे मनसुबे आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ”संघाने स्वप्न बघणे थांबवले पाहिजे. आम्ही ते कधीच पूर्ण होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची मागणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List