बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

खेळण्या-बागडण्याच्या, शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या वयात लहानगे मजुरीच्या दलदलीत फसल्याचे सर्रास बघायला मिळतात. कामगार व पोलीस विभागाकडून बालकामगारांविरोधात वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. परंतु त्या म्हणाव्या तितक्या प्रभावी नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. याला जनतादेखील तितकीच जबाबदार असून बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात.

जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त कामगार व पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा आढावा घेतला असता आजही बालकांना मंजुरीसाठी जुंपले जात असल्याचे भयानक वास्तव पाहायला मिळते. राज्यातील सर्व जिह्यांमध्ये जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कृती दलांनी सन 2023 पासून मार्च 2025 पर्यंत विविध ठिकाणी 603 धाडी टाकल्या. या कारवाईत 151 बालकामगार व 186 किशोरवयीन कामगारांची सुटका करण्यात आली. तसेच मुलांना मजुरीला जुंपल्याप्रकरणी 208 आस्थापना मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 148 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्या कारवाईत 85 बालकामगारांची सुटका करण्यात आली, तर 80 मालकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने जानेवारी ते जून या कालावधीत 40 बालकामगारांची सुटका करून 17 गुह्यांची नोंद केली व 19 आरोपींना बेडय़ा ठोकल्या. बालकामगारांविरोधात नागरिकांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. बालकामगार दिसल्यास तत्काळ त्याची तक्रार पोलीस अथवा कामगार विभागाकडे करावी, असे आवाहन दोन्ही विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला