स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार

दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात 50 टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 26 वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले.

शरद पवार बोलताना म्हणाले की, मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. अगदी सैन्य दलातही ते दिसून आले. ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषद, मनपा निवडणुका आल्यात. येथे पन्नास टक्के महिलांना संधी मिळाली तर त्याही कर्तुत्व दाखवतात. महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय आपल्याला यशस्वी करायचा आहे. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं वाटत नव्हतं. पण पडली. विचारात अंतर पडलं त्यामुळे फूट पडली. जे राहिले ते विचाराने राहिले. आता तेच विचार घेऊन जनतेला साथ देण्यासाठी राहिले. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका. एकसंध राहा जनतेशी बांधिलकी कायम ठेवा काहीच अडचण येणार नाही. जे राहिले ते विचाराने राहिले. आता तेच विचार घेऊन जनतेला साथ देण्यासाठी राहिले. उद्याच्याा निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. आता पुढील तीन महिने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करा. 50 महिलांना निवडून आणा, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या लोकांना जनतेने संधी दिली. अनेक पदे मिळाली. यातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्यातील अनेक सहकारी कधी सत्तेत नव्हते. पण त्यांना संधी मिळाली त्यातून एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रमाणिक कार्य़कर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तुत्व दाखवू शकतो. राज्य चालवू शकतो. तुमच्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले पण ते आज नाहीत. आर. आर पाटील. सामान्य कुटुंबातले होते. हा कोण मुलगा. मला सांगण्यात आलं त्यांचे नाव आर. आर. पाटील. मी चर्चा केली. माझ्या लक्षात आलं त्यांच्यात कर्तुत्व आहे. नंतर त्यांना संधी मिळत गेली. निवडणुकीत सत्ता मिळली. ग्रामविकास खाते नंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून काम केले. त्यांचे अनेक निर्णय जनतेला भावले. यातून राष्ट्रवादी सामान्यांना संधी देते असा संदेश गेला. यातून तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, बांधिलकीतून पक्षाची प्रतिष्ठा वाढली. असेही शरद पवार यांनी बोलताना म्हटले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 1980 मध्ये सत्ता गेली निवडणुका आल्या 50 ते 52 निवडून आले. पण नंतर फक्त 6 शिल्लक राहिले. त्यातील आजही एक येथे आहेत. आमचा पक्ष सहा जणांचा झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संख्या 72 झाली. त्यामुळे चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका. एकसंध राहा जनतेशी बांधिलकी कायम ठेवा काहीच अडचण येणार नाही. एका लहानशा घरात. एका खोलीत राहणारा, रात्री दोन वाजेपर्यंत लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून निलेश लंके त्यांच्याकडे पाहिलं जातं. हाच राष्ट्रवादीचा ठेवा. याचा विचार करा. सत्ता आपोआप येईल. ती येण्याची शक्यता आता मला दिसते आहे असे शरद पवार बोलताना म्हणाले.

शरद पवारम्हणाले की, देशाच्या आजूबाजूचं वातावरण चिंताजनक राष्ट्राच्या हिताच्या आड राष्ट्रवादी कधीच येत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही. सरकारच्या भूमिकेचं समर्थन करू असे तेव्हाच सांगितले होते. देशाचं चित्र पाहिलं तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन, शेजारी पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आहे. आजूबाजूचे देश आणि आपण यात काय स्थिती आहे. कुणाशीच संबंध चांगले राहिलेले नाहीत. नेहरूंच्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा भारत होता. बांग्लादेशही भारताचा मित्र राहिलेला नाही. श्रीलंकेवरील चीनचा प्रभाव चिंताजनक आहे. याचा अर्थ देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक केली नाही. आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण आता देशाच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्या. असे पवार यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प ‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सत्ता मिळताच पूर्तता न करता जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या महायुतीला क्या हुआ तेरा वादा? असा खणखणीत सवाल...
14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट
‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय
No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला
…तर न्यायव्यवस्था हस्तक्षेप करणारच, मात्र अतिरेक टाळावा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत