भावी जावई, अधिकाऱ्याची पात्रता शोधण्यासाठी आरटीआयचा वापर! कायद्याच्या दुरुपयोगाबाबत कोर्टाची नाराजी

भावी जावई, अधिकाऱ्याची पात्रता शोधण्यासाठी आरटीआयचा वापर! कायद्याच्या दुरुपयोगाबाबत कोर्टाची नाराजी

कायदे फायदेशीर उद्देशाने तयार केले जातात, मात्र हा विरोधाभास आहे. होणारा भावी जावई, तरुण सरकारी अधिकारी त्याची पात्रता अशी अनावश्यक माहिती गोळा करण्यासाठी आजकाल आरटीआय कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने माहिती अधिकाराच्या गैरवापराबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज्य माहिती आयोगाच्या आयुक्त पदांसह अन्य काही पदे रिक्त असल्याचा दावा करत माजी मुख्य माहिती आयुक्त शैलेश गांधी व काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रिक्त पदांमुळे आरटीआय संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही पदे लवकरात लवकर भरूण प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सरकारच्या वतीने वकील ज्योती चव्हाण यांनी मुख्य माहिती आयुक्त व सात विभागीय माहिती आयुक्त कार्यालयात एकही पद रिक्त नसल्याचे सांगितले. खंडपीठाने याची दखल घेत माहिती अधिकार कायदा – 2005 अंतर्गत दुसऱया अपीलांचा जलदगतीने निपटारा करण्यास सांगितले.

किती समोसे दिले
सुनावणीला माहिती अधिकार आयोगाच्या वकिलाने काही कार्यालयांमध्ये किती समोसे दिले गेले यासारखे काही फालतू अर्ज दाखल केले गेल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली तसेच प्राधिकरणासमोर एकूण प्रलंबित प्रकरणे फक्त 5 टक्के होती, असे खंडपीठाला सांगण्यात आले. त्यावर माहिती अधिकाराचा (आरटीआय) गैरवापर होत असल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला