जिंदाल कंपनीला ग्रामस्थांचा दणका, गॅस टर्मिनलचे काम बंद पाडले

जिंदाल कंपनीला ग्रामस्थांचा दणका, गॅस टर्मिनलचे काम बंद पाडले

गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने नांदिवडे येथील जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱयांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. शासनाचा आदेश मोडून गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले. कंपनीच्या या दादागिरीविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱया जिंदाल कंपनीवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने  गॅस टर्मिनलचे काम तत्काळ थांबवले आहे. तरीदेखील आज कंपनीच्या अधिकाऱयांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांचा विरोध असताना, शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडे गावातील लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदाल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख यांचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. आज नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये  त्वचेचे आजार असलेले रुग्ण, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात  आहेत. एवढा त्रास असूनदेखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे असा आरोप माजी सरपंच गुरू सुर्वे यांनी केला आहे.

शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित करावे. जिंदाल कंपनीवर कारवाई करावी, अशी सर्व शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला