मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूककोंडी फोडवण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांच्या कामांना वेग, 15 कोटींचा तातडीचा निधी देणार
मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱया वाहतूककोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. कोकणात ये-जा करणाऱया चाकरमान्यांना या वाहतूककोंडीमुळे बराच त्रास सहन करावा लागतो. ही कोंडी दूर करण्यासाठी चार पर्यायी मार्गांच्या कामांना गती देण्यात येणार असून त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आज राज्य शासनाने दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती व अन्य उपाययोजनांबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगर पंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर पॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता अशा चारही रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश या बैठकीत अजित पवार यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List