मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी

मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली. मात्र प्रचंड गर्दी असणाऱ्या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावल्यास प्रवासी गुदमरून संकट आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजापेक्षा रेल्वेच्या सेवासुविधा वाढवा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

याबाबत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांना निवेदन दिले. रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणावर पैसे खर्च करण्याऐवजी लोकल ट्रेनची चांगली सेवा देण्याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. स्वयंचलित दरवाजांचा पर्याय व्यवहार्य नसल्याचे अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणले. स्वयंचलित दरवाजे प्रणालीमुळे प्रवाशांची संख्या नियंत्रित होईल. या क्षमता नियंत्रणामुळे अनेक प्रवाशांना इच्छित लोकल पकडता येणार नाही. असे सावंत यांनी म्हटले आहे. यावेळी रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, शाखाप्रमुख जयवंत नाईक उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्या!

z मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह कुटुंबातील मृत प्रवाशाची पत्नी, मुलगा, मुलगी किंवा भाऊ यांना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या, अशी मागणीही यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली.

अशा आहेत मागण्या

z दिवा-सीएसटीएम लोकल तातडीने सुरू करा. z कल्याण आणि दिवा-सीएसएमटी लोकलची संख्या वाढवा. z कल्याण ते ठाणे शटल सेवा तत्काळ सुरू करा. z ठाणे ते पनवेल किंवा नवी मुंबई परिसर आणि कल्याण-ठाणे शटल सेवेला जोडणारी शटल सेवा सुरू करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India Plane Crash : 270 जणांचे मृतदेह हाती, घटनेच्या दोन दिवसांनी केंद्र सरकारला जाग; दिल्लीत घेतली पहिली पत्रकार परिषद Air India Plane Crash : 270 जणांचे मृतदेह हाती, घटनेच्या दोन दिवसांनी केंद्र सरकारला जाग; दिल्लीत घेतली पहिली पत्रकार परिषद
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत 270 मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडल्यानंतर केंद्र आणि गुजरात सरकारने घटनेच्या 24 तासांच्या...
Mumbai News – भरधाव डंपरने तिघांना चिरडले, गोवंडीत संतप्त जमावाकडून रास्ता रोको
WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटचा ‘डॉन’ ठरला!
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली आता सरकार आल्यावर फसवणूक, नाना पटोलेंची महायुतीवर टीका
शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा – हर्षवर्धन सपकाळ
नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम
टॅनिंगशी संबंधित या पाच मिथकांवर लोक ठेवतात सहज विश्वास, कोणते आहेत ते जाणून घेऊयात