पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही – शरद पवार

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही – शरद पवार

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील 55 टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको.अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडली आहे

शरद पवार बोलताना म्हणाले की, यात दोन भाग आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी येणं त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताच आहे. आज देशामध्ये जवळपास 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी 55 टक्के बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम, बंगाली, ठराविक लोकसंख्या याचा आधार घेते म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही. साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे. असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाबद्दलच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतील. विरोध का आहे? त्यावर सरकारची भूमिका काय आहे? राज्य सरकारचा वित्त विभाग या प्रकल्पाचं अर्थनियोजन कसं करणार आहे? हे सर्व जाणून घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाबद्दलच्या यश-अपयशाबद्दल भूमिका घेता येईल. वित्त विभागाने काय म्हटलय याची माहिती आलेली आहे. सरकारची बाजू ऐकायची म्हणतो, तेव्हा हे सुद्धा ऐकावं लागेल. पैसा लागेल, एवढा मोठा प्रोजेक्ट त्याच्यात किती यश येईल हे आज सांगता येणार नाही असेही शरद पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, विविध देशांमधील तणावाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना नसतानाही ते मी निर्णय घेतला असा दावा करतात. कुणाशी बोलतात हे माहिती नाही त्यामुळे त्यांची विधानं अस्वस्थ करणारी आहेत. युरोपात आणि मध्य पूर्वेत त्यांच्याबाबत नाराजी दिसते आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांवर मतं लादणं योग्य नाही. ह्याबद्दल भारताने स्वच्छ आणि देशहिताची भूमिका घेतली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर जितके पंतप्रधान झाले, त्यांनी आखाती देशांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमी पाठिंबा दिला. आपण इस्राईलशी शेतीसंबंध ठेवले, पण कधीही राजकीय संबंध ठेवले नव्हते. पण आताच्या आपल्या भूमिकेमुळे आखाती देशात आपल्याबाबत गैरसमज होतोय हे चांगलं नाही. असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, अकारण पुण्याच्या नामांतराच्या वादाला उभारी देऊ नका. बाजीराव पेशव्यांचं नाव का दिलं पाहिजे, हे मला कळत नाही. शौर्य हेच जर परिमाण असेल तर अनेकांची नावे देता येतील. छत्रपती संभाजी महाराजांकडे शौर्य आणि त्याग कमी होतं का? त्यामुळे अकारण समाजांमध्ये अंतर वाढवू नका.असे शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सकाळी उठल्यावर मान दुखतेय? मग झोपताना नक्की करताय ही गंभीर चूक सकाळी उठल्यावर मान दुखतेय? मग झोपताना नक्की करताय ही गंभीर चूक
गोड झोप ही शरीरासाठी तितकीच गरजेची असते, जितकी अन्न आणि पाण्याची गरज असते. मात्र, झोपताना केलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे मान...
भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?
संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम, होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग – हर्षवर्धन सपकाळ
Pandharpur News – आषाढी वारीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती सुसज्ज, मंदिर समितीची सभा संपन्न
आम्हाला खामेनींना संपवायचे होते, पण संधी मिळाली नाही – इस्रायली संरक्षण मंत्री
Jalna News – डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनाईल वापरले, गर्भवती महिलेच्या पोटाची त्वचा जळाली
समानता आणि धर्मनिरपेक्षता भाजप- संघाला बोचते, राहुल गांधी यांची टीका