दिवसाला 8 ग्लास पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

दिवसाला 8 ग्लास पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

पाणी हे जीवन आहे हे वाक्य आपल्या कानावर लहानापणापासून पडत आले आहे. पाण्याचं महत्त्व आपल्या शरीरासाठी अनन्यसाधारण आहे. मुख्य म्हणजे पाणी नसेल तर आपण जिवंतही राहू शकणार नाही. म्हणूनच शरीरासाठी पाणी हे मुख्य गरजांमध्ये येते. आपल्या शरीराल हायट्रेट राहण्यासाठी पाणी हे खूप गरजेचे आहे. पाणी पिण्यामुळे आपल्या शरीराचे अनेक आजार दूर होतात.

चहा किंवा काॅफी वारंवार पिण्याची सवय असेल तर, त्याआधी किमान एक ग्लास पाणी प्या. डिटाॅक्स केलेले पाणी पिण्यामुळे त्वचेला तजेला येतो. वयोमानानुसार, त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. पण, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो. त्वचेचा रक्तसंचयही चांगला वाढण्यासाठी पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे. पाणी पिण्यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो आणि त्वचेचा रंगातही सुधार होतो.

दिवसातून किती ग्लास पाणी प्यावे?

  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय, वजन, उंची आणि त्वचेसाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा, चमक आणि तसेच त्वचेचे आरोग्यही उत्तम टिकून राहते.
  • पाणी पिणे हे आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचे आहे. जास्त पीएचमुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेचा पीएच राखण्यासाठीही पाणी पिणे हे खूपच फायदेशीर ठरते.
  • शरीरात विषारी पदार्थांच्या उपस्थितीमुळे मुरुम, ऍलर्जी, तेलकट त्वचा होऊ शकते. हे विष बाहेर टाकण्यासाठी पाणी देखील प्यावे.
  • पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाहीत. त्वचेचा तजेला टिकविण्यासाठी कोमट पाणी पिणे हे सर्वाधिक गरजेचे आहे.

Dhaba Style Dal Fry – ढाब्यावरची खमंग डाळ फ्राय करा आता घरच्या घरी.. रेसिपी आणि सोबतीला उपयुक्त टिप्स

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या रक्तगटाच्या लोकांना सर्वांपेक्षा जास्त होतं असतं गरम; कारण जाणून आश्चर्य वाटेल या रक्तगटाच्या लोकांना सर्वांपेक्षा जास्त होतं असतं गरम; कारण जाणून आश्चर्य वाटेल
सध्या पावसाळा असला तरी काही प्रमाणात का होईना पण उष्ण वातावरणही आहेच. त्यामुळे कधी कधी पाऊस पडून गेल्यानंतर इतकं गरम...
रात्री झोपण्यापूर्वी तूप आणि कोमट पाणी प्यायल्याने शरीरात होतात हे बदल; मिळतील आश्चर्यकारक फायदे
गाढ झोपेत असताना अचानक खाली पडल्यासारखे का वाटतं? शरीर देत असतं हे संकेत, 90% टक्के लोकांना माहित नसेल कारण
Palghar News – खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश
आंबोली येथे 300 फूट खोल दरीत कोसळला कोल्हापूर येथील पर्यटक
पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही – शरद पवार
पिकनिकसाठी गेलेले एकाच कुटुंबातील 18 जण नदीत वाहून गेले, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल