पाकड्यांचे हिंदूवर अत्याचार; पाकिस्तानात चार भावंडाचे अपहरण करत जबरदस्तीने केले धर्मांतर
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील शाहदादपूर शहरात जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. येथे तीन हिंदू मुली आणि त्यांच्या चुलत भावाचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या चोघांचे त्यांच्या शाळेतील दोन शिक्षकांनी अपहरण केल्याचा आरोप कुटुंबायांनी केला आहे. मात्र पाकिस्तानातील माध्यमांच्या म्हणण्यानुसार या मुलांनी “स्वतःच्या इच्छेने” इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेला मुलगा फक्त 13 वर्षांचा आहे आणि एक मुलगी 15 वर्षांची आहे. इतर दोन मुली 19 आणि 21 वर्षांच्या आहेत. या दोघी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या चौघांचे अपहऱण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
अपहरण झालेल्या चारही मुलांना न्यायालयात हजर करून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच त्यांच्या कुटुंबाने देखील आपली बाजू मांडली. हे सर्व जबरदस्तीने घडले आहे. प्रथम त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेबद्दल सिंधच्या अनेक भागांमध्ये हिंदू समुदायात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानच्या संविधानानुसार सुरक्षा आणि न्यायाची मागणी करत आहेत, असे त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.
धर्मांतरास भाग पाडणाऱ्या मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा न्यायालयाने जबाब नोंदविला आणि याच आधारावर एक महत्त्वाचा निर्णय दिला. अल्पवयीन असलेल्या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावे. इतर दोन मोठ्या बहिणींना सुरक्षित ठिकाणी पाठवावे जेणेकरून त्या स्वतः विचार करू शकतील आणि काय करायचे ते ठरवू शकतील, असे न्यायालयाने म्हंटले आहे.
मानवाधिकार आयोग आणि पत्रकारांचा रोष
सिंध मानवाधिकार आयोगाने देखील या घटनेची दखल घेतली. त्यांनी सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुलांना जाणूनबुजून प्रौढ घोषित केले गेले. त्यांच्या खऱ्या ओळखपत्रांकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या मौलवींवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.त्यामुळे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी मानवाधिकार आयोगाचे एक कार्यकर्ते फराज परवेझ यांनी केली आहे.
या संदर्भात एका पाकिस्तानी पत्रकाराने देखील आवाज उठवला आहे. जर ही घटना इतर कोणत्याही देशात घडली असती तर पाकिस्तानी नेते आणि माध्यमांनी याबद्दल खूप आवाज उठवला असता. पण जेव्हा आपल्या देशातील हिंदू मुलींचा विचार केला जातो तेव्हा सर्वजण का गप्प राहतात, असा सवाल यावेळी पाकिस्तानी पत्रकार विंगस जे यांनी प्रश्न उपस्थित केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List