समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका

समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार यांनी आज वरळी कोळीवाडा येथील पविमोचनेश्वर मंदिराला भेट देऊन तेथील पूजेत सहभागी झाले. वरळी कोळीवाड्यातील काही रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रेला जात आहेत व तेथे जाण्यापूर्वी या मंदिरात शिव शंकराची पूजा केली जाते.

या पूजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा व समृद्धी महामार्गावरून राज्य सरकारला फटकारले आहे. ” भाजपचा मराठी व महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोण बघा. धारावी खाली करण्याचा त्यांचा हाच हेतू आहे की त्यांना मुंबईकर मुंबईत नकोयत. पोलीस कॅम्पमधल्या रिटायर पोलिसांना तिथून काढण्याचा प्रयत्न करतायत. धारावी खाली करण्याचा प्रयत्न करतायत. धारावीतील 80 टक्के लोकं अपात्र ठरवले गेले. आम्ही मुंबईत जे मराठी रंगभूमीचं दालन करत होतो ते यांनी रद्द केलं आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

बबनराव लोणीकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटाकरले, ” लोणीकर यांनी केलेले वक्तव्य हा फक्त लोणीकरांचा विचार नाही तर संपूर्ण भाजपचा विचार आहे. हे मनातलं विष लोणीकरांच्या माध्यमातून समोर आलं आहे. अशा वृत्तीला मत द्यायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं”‘, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांवरूनही आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. ” समृद्धी महामार्गाच्या मागच्या महिन्यात उद्घाटन झालेल्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला”, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलैदरम्यान होणाऱ्या पहिल्या युवा (18 वर्षांखालील) मुले व मुली यांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने...
कश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा
सुनीता शिरोडकर यांचे निधन
Jabbar Patel – ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शाहू पुरस्कार प्रदान
पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले
समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका
आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!