संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…

संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…

देशाचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) भूषण गवई यांनी बुधवारी अमरावती येथील एका कार्यक्रमात संविधान आणि संसदेच्या सर्वोच्चतेवर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट मत मांडलं. ते म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानात संसद नाही तर, संविधान सर्वोच्च आहे.” अमरावती येथे बार असोसिएशनने आयोजित केलेला पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कार्यकारी, कायदेमंडळ की न्यायपालिका, लोकशाहीचे कोणते अंग सर्वोच्च आहे, यावर नेहमीच वादविवाद होत असतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, संसद सर्वोच्च आहे. परंतु माझ्या मते हिंदुस्थानचे संविधान सर्वोच्च आहे. लोकशाहीचे तिन्ही अंग संविधानाच्या अंतर्गत काम करतात.”

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायाधीशांनी नेहमीच लक्षात ठेवावे की, नागरिकांच्या हक्कांचं, संवैधानिक मूल्यांचं आणि तत्त्वांचं रक्षक असणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडं केवळ शक्ती नाही तर, काही जबाबदाऱ्या देखील आहेत.” ते पुढे म्हणाले की, “न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयाबद्दल लोक काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल, यावर अवलंबून राहू नये. त्याऐवजी आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. लोक काय म्हणतील ते आपल्या निर्णय प्रक्रियेचा भाग बनू शकत नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Jabbar Patel – ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शाहू पुरस्कार प्रदान Jabbar Patel – ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शाहू पुरस्कार प्रदान
जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना 39 वा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोल्हापुरात शाहू स्मारक येथे एका कार्यक्रमात...
पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले
समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका
आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!
पंतप्रधानांनी कितीही अघोरी कृत्य केली तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात
मॅट्रिमोनी साईटद्वारे महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक, पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…