रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?

रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?

दिवसभर जवळपास सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण हा सर्व ताण जाणवतो तो रात्री. हा ताण, थकवा दूर करण्यासाठी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तर काहीजण झोपण्यापूर्वी त्यांचे चेहरा, हात आणि पाय धुतात. यामुळे त्यांना खूप आराम मिळतो. काही वेळेला खूप थकल्याने बऱ्याचदा आपण काम आवरून झाल्यानंतर लगेच झोपायला जातो. पण तज्ज्ञांच्या मते काहीही झाले तरी रात्री झोपण्यापूर्वी पाय मात्र आवर्जून पाय धुवूनच झोपावं. काय आहेत त्यामागील कारणे जाणून घेऊयात.

काहीजणांना नक्कीच हे दिवसाच्या शेवटी, पाय जड झाल्यासारखे वाटतात

खरंतर, पाय शरीराचा संपूर्ण भार उचलतात. काहीजणांना नक्कीच हे दिवसाच्या शेवटी, पाय जड झाल्यासारखे वाटतात. हे केवळ घट्ट बूट घालण्यामुळे किंवा दिवसभर उभे राहिल्यामुळेच नाही तर काळजीच्या अभावामुळे देखील होते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे, पायांनाही काळजीची आवश्यकता असते. काही लोक आळसामुळे पाय धुत नाहीत, जे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

पाय म्हणजे…. 

बाहेरून घरी आल्यानंतर लोक अनेकदा चेहरा आणि हात धुवायला जातात. पण जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा ते ते विसरून जातात. पाय न धुण्याची सवय तुम्हाला आजारी बनवू शकते. कारण पाय म्हणजे बॅक्टेरियांचं घर असतं. त्यांना धुण्यात दुर्लक्ष केल्याने तुमच्या पलंगावर जंतू पसरू शकतात. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. त्याचे अनेक फायदे आहेत.

पाय धुणे का आवश्यक आहे?

रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहे. दिवसभर पाय मोजे आणि शूजमध्येच राहतात. यामुळे खूप घाम येतो आणि जंतू वाढू लागतात. विशेषतः जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. जर पाय योग्य वेळी धुतले नाहीत तर बॅक्टेरिया वाढतात आणि पायाच्या बोटाभोवती खाज आणि ओलावा निर्माण होऊ लागतो. यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात आणि कधीकधी त्वचा सोलायला लागते. ज्याला अ‍ॅथलीट फूट असेही म्हणतात. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून संसर्ग पसरणार नाही.

अशा परिस्थितीत पाय धुणे खूप महत्वाचे

स्वच्छता राखण्यासाठी पाय धुणे महत्वाचे आहे. हे केवळ बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासाठीच नाही तर इतर प्रकारच्या संसर्गांसाठी देखील आवश्यक आहे. जर पायांवर चिरे असती किंवा मुरुम असेल तर शरीरात बॅक्टेरिया जाण्याची भीती असते. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात. अशा परिस्थितीत पाय धुणे खूप महत्वाचे आहे.याशिवाय, रात्री पाय धुण्याने पायांची दुर्गंधी दूर होतेच, शिवाय चांगली झोपही येते. कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून पाय बुडवून धुण्याने स्नायूंना आराम मिळतो आणि सांध्यांना आराम मिळतो.

मधुमेही रुग्णांनी रात्री पाय धुणे खूप महत्वाचे आहे

मधुमेही रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायांमधून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. पायांवरील जखमांची स्वच्छता करणे महत्वाचे आहे. जेणेकरून गँगरीन, पू जमा होण्याची शक्यता राहणार नाही. म्हणून त्यांनी विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. आणि ते स्वच्छपणे कोरडेही करावे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – कुर्ला आणि सायन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प Mumbai News – कुर्ला आणि सायन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प
कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने सोमवारी रात्री सीएसएमटीकडे जाणारी अप जलद मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. या घटनेमुळे चाकरमान्यांची...
Iran Attacks US Air Base: कुवेत, इराक, युएई, बहरीन, कतारने हवाई क्षेत्र बंद केले
फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, दिलीप दोशी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन
Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली
जम्मू आणि कश्मीर हा हिदुस्थानचा अंतर्गत मुद्दा, परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीवर साधला निशाणा
लँडिंगच्या तयारीत होते एअर इंडियाचे विमान, अचानक बेशुद्ध पडले चार क्रू मेंबर्स; प्रवाशांमध्ये पसरली घबराट
नाट्यसप्तकाला नाशिककरांची मिळाली दाद, महाकवी कालिदास कला मंदिरात रंगला संस्कृत नाट्य महोत्सव