दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?

दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?

दिल्लीहून जम्मूला एअर इंडियाचे विमान रवाना झाले. मात्र जम्मूला पोहचल्यानंतर लँडिंग न करताच दिल्लीला माघारी परतले. विमान दिल्लीला माघारी का वळवले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. सध्या याबाबत चौकशी सुरू आहे.

एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स-2564 हे विमान दिल्लीहून नियोजित वेळेत जम्मूला रवाना झाले. जम्मू विमानतळावर नियोजित वेळेवर पोहचल्यानंतर विमानाने आकाशातच काही वेळ घिरट्या घातल्या. यानंतर पायलटने विमान जम्मू विमानतळावर लँडिंग न करता पुन्हा दिल्ली विमानतळावर माघारी आणले.

जम्मू विमानतळावरील हवामान लँडिंगसाठी उपयुक्त होते. रनवेही वापरण्यास योग्य होते. यामुळे लँडिंगमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. असे असतानाही पायलटने विमान लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अद्याप एअरलाईन आणि पायलटकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल