पनवेलमधील धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री, पावसाळी सहलीत नागरिकांचा हिरमोड

पनवेलमधील धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री, पावसाळी सहलीत नागरिकांचा हिरमोड

पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून गेल्याच्या किंवा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तालुक्यातील धरण क्षेत्र व धबधब्यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

पनवेल तालुक्यात गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरण असून वारदोली, कुंडी, आदई, नेवाळी असे धबधबे आहेत. तसेच तालुक्यातील हरिग्राम, धोदाणी, चिंध्रन, महोदर, शांतीवन, गाढी अशी नदीपात्र आहेत. ही सर्व पर्यटनस्थळे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांवर गर्दी करतात. मात्र अशा ठिकाणी काही हुल्लडबाज आणि दारुडेदेखील मौजमजा करण्यासाठी येतात. दरम्यान धरण, धबधबे किंवा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या पावसाळी पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्या आदेशान्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे.

“पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दुर्घटना होत असल्याने त्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच पोलिसांनी उभारलेल्या फरकांवरील सूचनांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”

गजानन घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात असे म्हटले जात आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च...
जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा यांची समोरासमोर चौकशी, हेरगिरीवरून पाकिस्तानचा पर्दाफाश होणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही, निवडणूक आयोग गप्प का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा – अंबादास दानवे
Chhattisgarh Encounter – छत्तीसगमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलाच्या गोळीबारात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा
Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान
काळे चणे कोणत्या प्रकारे खाणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत