मुलीच्या जन्मानंतर गावकरी लावतात 111 रोपं
राजस्थानमधील एका गावाने सामाजिक बदलाचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. राजसमंद जिह्यातील पिपलांत्री असे या गावाचे नाव असून त्याची कहाणी प्रेरणादायी आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर पिपलांत्री गावात 111 देशी झाडे लावली जातात. पर्यावरणाबरोबरच मुलींचे संगोपन आणि संरक्षण करण्याची प्रतिज्ञा यानिमित्ताने घेतली जाते. आतापर्यंत चार लाखांहून अधिक झाडे या गावाने जगवली आणि ओसाड जमिनीवर हिरवे रान फुलवले. गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब, शिसम, आंबा, वड, पिंपळ यांसारखी अनेक झाडे जगवली. राजस्थानच्या कोरडय़ा जागेचे वसलेले गाव हरित झाले. गावात 111 झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. पिपलांत्री गावाचे सरपंच डॉ. श्याम सुंदर पालिवाल यांनी या मोहिमेला सुरुवात केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List